या सृष्टीतील कोणताही जीव कोणते ना कोणते कार्य अथवा कर्म करण्यास बांधील आहे. कारण कार्यरत असणे हा जीवाचा स्वभाव आहे. भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भगी 3,5) न हि कश्चित्क्षणमपि जातु ति÷त्यकर्मकृत् । कार्यते
ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः। अर्थात ‘प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असाह्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते, म्हणून कोणालाही
एक क्षणभरसुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही.’ आपले शरीर हे
एका विद्युत प्रवाह नसलेल्या यंत्राप्रमाणे म्हणजे स्तब्ध अवस्थेत असते पण ते आत्म्याद्वारे चालविले जाते. जसे एखादे वाहन हे चालकाशिवाय स्तब्धावस्थेत राहते त्याचप्रमाणे आत्मा हा प्रत्येक शरीराचा चालक आहे आणि जेव्हा हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा त्या शरीराला मृत शरीर असे म्हणतात. आणि ज्याप्रमाणे वाहनामध्ये व्यक्ती वाहन चालवण्यासाठीच बसते त्याचप्रमाणे आत्मा ज्या शरीरामध्ये उपस्थित आहे ते शरीर कार्यरत असते.
यासाठी केवळ कर्म करा हाच केवळ भगवद्गीतेचा संदेश नसून कर्म कसे आणि कोणासाठी करावे हे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या माध्यमातून शिकवीत आहेत. कारण तुमची इच्छा असो वा नसो कर्म करावेच लागते पण ते करीत असताना त्या कर्माची पूर्तता कशी होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण आपण जे कर्म करतो त्या कर्माची फळे अथवा परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. आपणच सर्व कर्माचे कर्ता आहोत आणि कोणतेही कार्य आपल्या हिमतीवर पूर्ण करू शकतो असे समजणे हा मिथ्या अहंकार आहे कारण प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नाही हे भगवतगीता स्पष्ट करते.
भगवान श्रीकृष्ण सांगतात (भगी 3) प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते। अर्थात ‘मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणाद्वारे कर्मे केली जातात.’ मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहीत नसते की, हे पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पाच स्थूल आणि मन, बुद्धी आणि अहंकार या सूक्ष्म शरीरापासून बनलेले आहे आणि भगवंताच्या आदेशानुसार कार्यरत असलेल्या प्रकृतीचा एक अभिन्न अंश आहे. आपल्या इंद्रियतृप्तीकरिता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱया शाश्वत संबंधाचे विस्मरण होते. यासाठी कार्यपूर्ती कशी होते हे भगवतगीतेच्या मार्गदर्शनानुसार समजून घेतले पाहिजे.
भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 18.13)पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे । सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् । ‘हे अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची पाच कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे.’ कोणतेही कार्य कोणी एकटा करू शकत नाही तर त्याला पुढील पाच कारणांवर अवलंबून रहावे लागते. याचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण सांगतात (भगी 18.14) अधि÷ानं तथा कर्ता करणं च पृथग्वधिम् । विविधाश्च पृथक्®ाsष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् । अर्थात ‘कर्माचे स्थान (शरीर) कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा-ही पाच कारणे होत.’ या पाच कारणांचा ताळमेळ कसा असतो हे समजणे महत्त्वाचे आहे. अधि÷ान म्हणजे शरीर. शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो जेणेकरून कर्माचे फळ प्राप्त करता येते म्हणून त्याला कर्ता असे म्हणतात. आत्मा हा ज्ञाता व कर्ता आहे. इंद्रिये ही कर्माची साधने आहेत आणि आत्मा इंद्रियांच्या मदतीने निरनिराळी कर्मे करीत असतो. प्रत्येक कर्माकरिता वेगळा प्रयत्न असतो, परंतु आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात, जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपात स्थित असतो.
हृदयस्थ परमात्मा हे भगवान श्रीकृष्णाचे विस्तार रूप आहे आणि हेच सर्व कारणांचे कारण आहे. आणि अशा हृदयस्थ परमात्म्याच्या निर्देशाखाली जो आत्मा कार्य करत असतो त्याला कर्मबंधनात अडकून पडावे लागत नाही.
पुढे वर्णन येते (भगी 18.15) शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः । न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः। अर्थात ‘शरीराने अथवा वाणीने किंवा मनाने न्याय्य किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या पाच कारणामुळे घडत असते’. या श्लोकातील न्याय्य (योग्य) आणि त्यांच्या विपरीत (अयोग्य) हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. योग्य कार्य, गीतेमध्ये दिलेल्या आदेशानुसार केले जाते आणि अयोग्य कार्य म्हणजे भगवतगीतेच्या आदेशाविरुद्ध केलेले असते. पण काही का असेना कर्माच्या पूर्णतेकरिता ही पाच कारणे आवश्यक आहेत.
परंतु अज्ञानी जीवांना हे समजत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 18.16) तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः । पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः। अर्थात ‘म्हणून या पाच कारणांचा विचार न करता, ज्याला वाटते की, तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही.’
थोडक्मयात सांगायचे तर अज्ञानी मनुष्याला समजत नाही की, परमात्मा रूपाने भगवंत प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत व त्यांच्या कर्माचे संचालन करीत आहेत.
जरी स्थान, कर्ता, प्रयत्न व इंद्रिये ही भौतिक करणे असली तरी अंतिम कारण स्वतः भगवंत आहेत. म्हणून मनुष्याने केवळ या चार भौतिक कारणांनाच पाहू नये, तर परम कारणांकडे म्हणजे भगवंताकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. जो या परमात्म्याला पर्यायाने भगवंतांना पाहत नाही तो स्वतःलाच कर्ता मानीत असतो.
संत तुकाराम महाराज अशा लोकांविषयी आणि वर वर्णन केलेल्या सर्व परिस्थितीचे विश्लेषण एका सुंदर अभंगात करतात. चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरिविण ।।1।। देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नको ।।2।। माणसाची देव चालवी अहंता। मीचि एक कर्ता म्हणो नये ।।3।। वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता। राहिली अहंता मग कोठे ।।4।। तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणे काय आहे चराचरी ।।5।। अर्थात ‘हा देह कोणाच्या सत्तेने व्यवहार करीत आहे? श्रीहरीविना त्याला कोण बोलवीत आहे?
सर्वाना डोळय़ांनी पाहविणारा आणि कानांनी ऐकविणारा एक नारायणच आहे. त्याचे भजन करण्यास कधी चुकू नका आपल्या मनाचा अहंकारही चालविणारा नारायणाच आहे.
म्हणून मीच कर्ता करविता आहे असे अभिमानाने म्हणू नये. वृक्षाचे पानही नारायणाच्या इच्छेनेच हलते, मग आपला अहंकार तरी कुठे राहिला? तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल भगवंत सर्व चराचर जगतात अंतर्बाह्य व्यापलेला आहे, त्याच्याव्यतिरिक्त या जगात काय आहे?
सर्व काही स्वयंसंचालित उपकरणाद्वारे चालवल्या जाणाऱया या जगात हे सर्व वर्णन म्हणजे एक कपोलकल्पित भ्रम असल्याचा आरोप करण्यात येईल.
तथापि, आपल्या डोळय़ावरची अज्ञानाची झापड दूर करून जर नम्रपणे बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला आढळून येईल की आपल्या हातामध्ये कोणत्याही कार्याचे पूर्ण नियंत्रण नाही. सर्व कार्य सिद्धीस नेण्यास म्हणजे परिपूर्ण होण्यास सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर वर्णन केल्याप्रमाणे पाच कारणे, त्यातही पाचवे कारण म्हणजे भगवंत हे महत्त्वाचे आहे.
-वृंदावनदास