तरुणभारत ऑनलाइन
पावसाळ्यात बदलत्या आणि अस्थिर वातावरणामुळे पिंकांवर किडींचा प्रादुर्भाव दुपटीने वाढत असतो जर यावर वेळीच योग्य खत नियोजन तसेच किडीं व रोगांसाठी उपाय केले नाहीत तर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. म्हणूनच या किडीवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवता येईल?त्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय आहेत ?हे जाणून घेऊया.
पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य रोगांना आळा घालण्यासाठी बुरशीनाशकांची बुरशीनाशकाची फवारणी करावी. पिकाची कायिक वाढ होत असताना पिकाचे सतत निरीक्षण करावे. किडींच्या विविध अवस्था अभ्यासाव्यात.त्यानुसार पिकांवर कीटकनाशकांची योग्य ती फवारणी करावी. भातासारख्या पिकामध्ये पाण्याची पातळी 5 सेमी इतकी ठेवावी.बाकी पिकामध्ये तुंबणारे पाणी शेताबाहेर काढावे. ऊसामध्ये झालेल्या हुमणी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी मेटरझियम एनीसोपली नावाची बुरशी शेतामध्ये टाकावी.वांगी-टोमॅटो यांसारख्या पिकावर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो.ही पिके घेणे शक्यतो टाळावी.जरी घेत असाल तर एकात्मिक किट व्यवस्थापन अवलंबवावे.पिकामध्ये येणारी कीड ओळखून त्यानुसार सुरवातीपासूनच कामगंध सापळे लावून घ्यावेत.सापळ्यात पतंगांची संख्या जास्त सापडत असेल तर सापळ्यांची संख्या वाढवावी.मोहरी,झेंडू,यांसारख्या सापळा पिकांचा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापर करावा.लष्करी अळीसाठी मक्का व एरंड या सापळा पिकांचा वापर करावा.पण कीटकनाशकांचा वापर देखील योग्य प्रमाणात करावा जेणे करून या काळात किडीमध्ये प्रतिरोध क्षमता तयार होणार नाही.