मावलणसमोर पाच सागरी मैलावर आलाय तवंग
मालवण/प्रतिनिधी-
तेलवाहु पार्थ जहाज दुर्घनेनंतर तब्बल एका आठवड्यानंतर मालवणसमोर पाच सागरी मैल अंतरावर (१२ वाव) प्लास्टिक पिशव्या जाळल्यानंतर जसा चिकट पदार्थ तयार होतो तसा काळा तवंग मच्छीमारांना दिसून आला. काही प्रमाणात हा तवंग मच्छीमारांच्या जाळ्यातही अडकला आहे. त्यामुळे तलगळतीनंतर तवंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांकडे सरकतोय याला कुठेतरी पुष्टी मिळतेय असे बोलले जात आहे. संबंधित यंत्रणांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.