काँग्रेस नेत्याकडून ‘औकात दिखा देंगे’ वक्तव्य ः पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / सुरेंद्रनगर
गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एंट्रीसह वाप्युद्ध तीव्र झाले आहे. काँग्रेस नेते मधुसून मिस्त्राr यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीत ‘औकात’ (लायकी) दाखवून देऊ असे म्हटले होते. मिस्त्राRच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. माझी कुठलीच औकात नाही आणि आमची औकात केवळ सेवा करण्याची आहे असे मोदींनी म्हटले आहे. यापूर्वी 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी मणिशंकर अय्यर यांनी मोदींना उद्देशून केलेल्या ‘नीच’ टिप्पणीमुळे काँग्रेसला चांगलाच फटका बसला होता. अय्यर यांच्या टिप्पणीनंतर पंतप्रधान मोदींनी राज्यातील दुसऱया टप्प्यातील प्रचाराची दिशाच बदलून टाकली होती.
सुरेंद्रनगरमध्ये भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित केले आहे. काँग्रेस नेते माझ्या औकातीबद्दल बोलत आहेत. औकात दाखवून देऊ असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु माझी कुठलीच औकात नाही असे मी सांगतो. आमची औकात केवळ सेवा करण्याची आहे. काँग्रेस नेते राजघराण्याशी संबंधित आहेत तर मी अत्यंत सामान्य कुटुंबातून आलो आहे. आम्ही सेवाकर्ते, नोकर आहोत. नोकराची कुठलीच औकात नसते. काँग्रेसने मला नीच जातीचा, मृत्यूचा सौदागर संबोधिले. नाल्यातील कीडा ठरविले. काँग्रेसचे नेते माझी औकात काय असे विचारत आहेत, परंतु माझे म्हणणे आहे की विकासाच्या मुद्दय़ावर या सर्वांनी चर्चा करावी. विकसित गुजरात निर्माण करण्यासाठी मैदानात उतरावे औकात काढण्याचा खेळ सोडून द्यावा असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
काँग्रेसकडून अहंकाराची भाषा
मधुसूदन मिस्त्राr यांच्या वक्तव्याला मोदींनी या सभेत प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या तोंडी अहंकाराची भाषा आहे. तर आमचे काम गुजरातला विकासाची नवी उंची गाठून देणे आहे. गुजरातच्या घरोघरी 24 तास वीज पोहोचविणे एक कठिण कार्य आहे, परंतु मी कठोर मेहनत करतो आणि काम पूर्ण करून दाखवितो. आमची सूरसागर डेअरी आता सुखसागर डेअरी झाली आहे. मीठ उत्पादनाप्रकरणी आमचे सुरेंद्रनगर सर्वात आघाडीवर आहे. भारतात 80 टक्के मीठ गुजरातमध्ये तयार होते आणि यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
मधुसूदन मिस्त्राRचे वक्तव्य
12 नोव्हेंबर रोजी काँग्रेसने स्वतःचे घोषणापत्र जारी केले होते. यानंतर बोलताना मधुसूदन मिस्त्राr यांनी गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदींना त्यांची औकात दाखवून देऊ असे म्हटले होते. मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी ते सरदार पटेल होऊ शकत नाहीत. गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलण्यात येईल असे मिस्त्राr यांनी नमूद केले होते.
अय्यरांमुळे काँग्रेसचे नुकसान
मधुसूदन मिस्त्राr यांच्या वक्तव्याला भाजपने पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या अपमानाशी जोडले आहे. मिस्त्राr यांचे हे विधान काँग्रेससाठी अडचणीचे सबब ठरू शकते. 2017 मध्ये काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून ‘नीच’ शब्द वापरला होता. यामुळे काँग्रेसला राज्यात मोठे नुकसान झाले होते. चुरशीच्या लढतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी प्रचारसभांमध्ये अय्यर यांच्या वक्तव्याचा पुरेपूर वापर केला होता.