पुणे / प्रतिनिधी :
आघाडी सरकारमध्ये आपल्याला गृहखाते हवे होते, पण वरिष्ठांनी ते दिले नाही, अशी मनातली खदखद विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी बोलून दाखविली.
अजित पवार सध्या पुणे जिह्यातील विविध मतदारसंघांचा दौरा करत आहेत. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे. अजित पवार म्हणाले, पाच वर्षापूर्वी मला उपमुख्यमंत्री केले तेव्हा मी वरिष्ठांना म्हटले होते की माझ्याकडे गृहखाते द्या. पण ते मिळाले नाही, पहिल्यांदा अनिल देशमुखांना हे खाते मिळाले. त्यांच्याकडून हे गृहखाते गेल्यावर म्हटले होते की आता तरी द्या. त्यानंतर ते खाते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गेले. वरिष्ठांनी निर्णय घेतल्यानंतर बोलता येत नाही.
अधिक वाचा : खानदेशातील लोकप्रिय डान्सर जोडप्याला पुणे पोलिसांनी केली अटक
वरिष्ठांना वाटले की, याच्याकडे गृहखाते दिले तर आपलं कोण ऐकणार? हे खर आहे की माझ्याकडे गृहखाते दिले तर मला जे योग्य वाटते तेच करणार. सगळय़ाचा समान न्याय देतो, राष्ट्रवादीचा जर कोणी चुकला, आणि मला कोणी सांगितले की दादा याला पोटात घ्या. पण मी कुणालाही पोटात घेत नाही. सगळय़ांना नियम सारखेच. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर त्याच्यासाठी जीवाचे रान करेल, पण चुकला तर, त्यांच्यावर पांघरुण घालणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.