ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजपाच्या विकृत-विखारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाहीर सभेत शनिवारी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) म्हणाले की, ज्या पक्षाने आतापर्यंत शिवसेना भाजपाला शिव्या घातल्या अशा लोकांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात याचा अर्थ तुम्ही आता हिंदुत्व सोडलेले आहे. हिंदुत्वाच्या गप्पा सभा घेऊन मारणे आता तुम्ही बंद केले पाहिजे. बाबरी पाडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो. एकही शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता, असे वक्तव्य रोवसाहेब दानवे केले आहे.
मुंबईला स्वतंत्र करण्याच्या भाजपा नेत्यांच्या भाषेमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. मात्र तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा देत भाजपाच्या विकृत-विखारी हिंदुत्वामुळे देशाची दुर्दशा झाल्याची टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली आहे. त्यानंतर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
मुंख्यमंत्र्यांच्या सभेबद्दल जनतेला खूप उत्सुकता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने सर्वांची निराशा झाली. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून राज्य सरकार काय करत आहे आणि काय करणार आहे, राज्याची सध्याची स्थिती काय आहे, अशा प्रकारची वक्तव्ये यायला हवी होती. पण मुख्यमंत्र्यांनी विकासाची चर्चा न करता, राज्यातल्या जनतेला कोणतीही घोषणा न करता त्यांनी केवळ भाजपावर तोंडसुख घेण्याचे काम केले आहे,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.
“तुम्ही हिंदुत्व सोडले की नाही याचे प्रमाणपत्र आता देण्याची गरज नाही. पण तुम्ही सांगता की आम्ही हिंदुत्व नाही तर भाजपाला सोडले यावरुनच सिद्ध होते की तुम्ही हिंदुत्व सोडले आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे म्हणण्याची कधीही वेळ आली नाही. ज्या पक्षाने आतापर्यंत शिवसेना भाजपाला शिव्या घातल्या अशा लोकांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात याचा अर्थ तुम्ही आता हिंदुत्व सोडलेले आहे. हिंदुत्वाच्या गप्पा सभा घेऊन मारणे आता तुम्ही बंद केले पाहिजे. बाबरी पडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो. एकही शिवसैनिक तिथे नव्हता,” असेही दानवे म्हणाले.