- दोघे संशयीत ताब्यात
- अधिक माहिती सांगण्यास पोलिसाचा नकार
इचलकरंजी / प्रतिनिधी
Ichalkaranji Crime News : शहरालगतच्या शहापूर येथील विठ्ठलनगरात एका टोळक्याने सशस्त्र हल्ला करून एका युवकाचा खून केला.रेहमान मल्लीक नदाफ ( रा. विठ्ठलनगर, शहापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. खूनाची घटना सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून, हा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचे पोलिसाच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.या खून प्रकरणी दोघा संशयीताना पोलिसांनी ताब्यात घेतले,अशी माहिती सुत्रांनी दिली.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी,मृत रेहमान नदाफ यांने गेल्या काही दिवसापूर्वी शहापूरातील विठ्ठलनगरच्या चौकालगत पानपट्टीचा व्यवसाय सुरू केला होता.तसेच त्याचा शहापूरमधील तरुणाबरोबर आर्थिक व्यवहारातून मोठा वाद झाला होता.हा मिटविण्याचे कारण सांगून सुमारे चार जणाच्या टोळक्याने सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्याला पानपट्टीच्या खोक्यापासून बोलावून विठ्ठलनगरातील खणीजवळ आणले. त्यांच्यावर कोयत्या सारख्या हत्याराने सशस्र हल्ला केला. या हल्यात त्यांची मान, कान आणि हातावर शस्त्राचा वर्मी वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारा करीता आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.
अधिक वाचण्यासाठी- पंढरपूरला जाताना मायलेकांवर काळाचा घाला;वळिवडे गावावर शोककळा
या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह शहापूर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी घडल्या घटनेची माहिती घेतली. याच दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना हा खून सुमारे चार जणाच्या टोळक्याने केल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरुन पोलीस अधिकाऱ्यानी संशयीत आरोपीच्या शोधासाठी पोलिसाची पथके त्वरीत रवाना केली. पण तपासाच्या नावाखाली संशयीत आरोपीची नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला. मंगळवारी पहाटेपर्यंत पोलिसांना संशयीताचा ठाव ठिकाणा समजलेला नव्हता. त्यामुळे पोलीस संशयीताचा चाचपटत शोध घेत होते. मंगळवारी सकाळी या खून प्रकरणी दोघा संशयीताना पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती सुत्रांनी दिली. या खूनाची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.