रिंगरोडविरोधात शेतकऱयांचा एल्गार : विद्यार्थ्यांसह वृद्धांचा सहभाग, चाबूक फटकाऱयांनी निषेध
प्रतिनिधी /बेळगाव
विकासाच्या नावाखाली आपल्या जमिनी बळजबरीने बळकावून घेत असाल तर शेतकरी तुम्हाला हिसका दाखविण्यासाठी सज्ज आहेत, असा इशारा देत हजारो शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपली ताकद दाखवून दिली. शेतकऱयांच्या या एकजुटीने जिल्हा प्रशासनालाही आता नमते घेण्याची वेळ येणार आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील मोर्चासमोर येण्यास टाळाटाळ करत होते. मात्र शेतकऱयांनी जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी आले पाहिजेत. त्यांनाच आम्ही निवेदन देऊ, असे सुनावले. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी स्वतः उपस्थित राहून निवेदन स्वीकारले व आश्वासनही दिले.
तालुका म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली रिंगरोड विरोधात मोर्चा काढण्यात आला. याला सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला. शेतकऱयांच्या पाठीशी आम्ही ठाम असल्याचे बेळगाव तालुक्मयातील आणि शहरातील जनतेनेही दाखवून दिले. अत्यंत शिस्तबद्ध, कोणताही भाषाभेद, जातीभेद न बाळगता केवळ शेतकरी म्हणून आम्ही रिंगणात उतरत असल्याचे स्पष्ट केले. या मोर्चाला एकाही आमदाराने पाठिंबा दिला नाही. मात्र शेतकरी एकजूट झाला आणि त्याने या प्रस्थापितांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
शेतकरी हा कुठल्या भाषेचा, जातीचा नसतो. केवळ शेतात घाम गाळून देशाला अन्न पुरवितो. मात्र त्याची जमीनच काढून घेतल्यानंतर घाम कोठे गाळायचा आणि अन्न कोठून द्यायचे? असा प्रश्न त्यांना पडणे साहजिक आहे. जेव्हा शेतकऱयांवर संकट येते, त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा शेतकरी पेटून उठला की काय होते? हे सोमवारी मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासनाला शेतकऱयांनी दाखवून दिले. तुम्ही जमिनी घेत असाल तर आम्ही शेतात राबणारे शेतकरी तुम्हाला हिसका दाखविण्यास सज्ज आहोत, असा इशारा दिला आहे. बेळगाव तालुक्मयातील समस्त शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सरकारला आपली ताकद दाखवून दिली आहे.
जिल्हाधिकाऱयांकडून आश्वासन
शेतकऱयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा गेल्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील हे निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी शेतकऱयांचा हा विरोध मी सरकारकडे पाठवून देईन. शेतकऱयांच्या जमिनी जाणार नाहीत, यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरापासून 10 कि.मी.च्या अंतरावर रिंगरोड करण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातला. शेतकऱयांना अंधारात ठेवण्यासाठी त्याबाबत इंग्रजी आणि एका कन्नड वृत्तपत्रातून रिंगरोडसाठी विविध गावच्या जमिनी घेण्याबाबत दि. 13 ऑक्टोबर रोजी नोटीस दिली. त्यानंतर सारे खडबडून जागे झाले. शेतकऱयांच्या पोटापाण्याचा प्रश्न तर आलाच, मात्र जनावरे आणि शेतीवर अवलंबून असलेल्या इतर घटकांचाही प्रश्न गंभीर बनणार हे दिसून आले. त्यामुळे एकजुटीने त्याला विरोध करायचाच, असा निर्धार शेतकऱयांनी केला आणि सोमवारच्या मोर्चात तो निर्धार दाखवून दिला.
शेतकरी हा चाबूक, कुदळ, फावडा, आकडी, कुऱहाडीसह शेतात राबतो. मात्र जर तुम्ही आमची शेती काढून घेतली तर चाबूक आणि आकडी दाखविण्यास आम्ही सज्ज असल्याचे त्यांनी दाखवून दिले. धर्मवीर संभाजी चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये लहान मुलांसह महिला, वृद्धांनीही भाग घेतला. ढगाळ वातावरण त्यातच मधूनच कडक ऊन यामुळे लहान मुले आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागला. मात्र काही ठिकाणी बसून विश्रांती घेऊन पुन्हा मोर्चामध्ये सहभागी होणारे वृद्ध दिसून आले.
शेतकऱयांची संख्या इतकी होती की, जर ट्रक्टर, टेम्पो या मोर्चामध्ये सामील करण्यात आले असते तर धर्मवीर संभाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयाचा संपूर्ण रस्ताच बंद झाला असता. त्यामुळे सरदार्स मैदानावर ट्रक्टर तसेच इतर वाहने पार्किंग करण्यात आली. त्यानंतर सर्वच गावचे शेतकरी त्या मोर्चामध्ये सहभागी झाले. लहान मुलांसह वडीलधाऱयांनी चाबूक घेतला होता. चाबूक वाजवून साऱयांनीच इशारा दिला आहे. कित्तूर चन्नम्मा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेला. त्या ठिकाणी ट्रक्टर, ट्रॉलीवर उभे राहूनच शेतकरी नेते तसेच म. ए. समितीच्या नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले.
माजी आमदार मनोहर किणेकर, भारतीय कृषक संघटनेचे सिध्दगौडा मोदगी, बार असोसिएशनचे अध्यक्ष
ऍड. प्रभू यत्नट्टी यांच्यासह इतर नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले. विचार व्यक्त करताना शेतकऱयांनी भरभरून साद दिली. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असा निर्धार यावेळी साऱयांनीच दाखवून दिला.
रिंगरोडमध्ये एकूण 32 गावातील 1300 एकर जमीन रस्त्यासाठी घेतली जाणार आहे. ही सर्व जमीन तिबार पिकी आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्मयातील शेतकऱयांचे अस्तित्वच नाहीसे होणार आहे. या रिंगरोडमध्ये अगसगा, आंबेवाडी, बाची, बहाद्दरवाडी, बिजगर्णी, गोजगे, होनगा, कडोली, काकती, मास्तमर्डी, कलखांब, कल्लेहोळ, कमकारट्टी, कणबर्गी, कोंडसकोप, मास्तमर्डी, मण्णूर, मुचंडी, मुतगा, नावगे, संतीबस्तवाड, शगमनमट्टी, शिंदोळी, सोनट्टी, येळ्ळूर-सुळगा, तमनायकनट्टी-धामणे, तुरमुरी, उचगाव, वाघवडे, यरमाळ, येळ्ळूर, झाडशहापूर या गावांतील शेतकऱयांच्या जमिनी जाणार आहे. या सर्व गावची जमीन ही तिबार पिकी आहे. त्यामुळे रिंगरोडचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली
आहे.
होनगा येथे टर्मिनलसाठी 100 एकर
राष्ट्रीय महामार्ग रस्त्याला लागूनच होनगा येथे टर्मिनलसाठी 100 एकर जमीन घेण्याचा प्रस्ताव आहे. ती सर्व जमीन सुपीक आहे. त्यामुळे जमीन देणे अशक्मय आहे. जर अशा प्रकारे शेतकऱयांच्या जमिनी घेऊन विकास करायचा असेल तर आम्हाला तो विकासच नको, अशाच प्रतिक्रिया यावेळी बहुसंख्य शेतकऱयांनी आणि संघटनांच्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केल्या आहेत.
भ्रष्टाचार निर्मूलन परिवारची जागरुकता
कन्नड आणि इंग्रजी वृत्तपत्रामध्ये आलेल्या नोटिफीकेशनची माहिती भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी अनेक पत्रकारांना सांगितली. त्यानंतर दुसऱया दिवशी वृत्तपत्रांमधून रिंगरोडला घेण्यात येणाऱया गावच्या जमिनी संदर्भात माहिती देण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर जनजागृतीला सुरुवात झाली आणि एक भव्य मोर्चा काढून आपला विरोध दर्शविण्यात आला.
विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा
शेतकऱयांच्या या मोर्चाला शेतकरी संघटनांनी तर पाठिंबा दर्शविलाच होता. याचबरोबर बांधकाम संघटना, बार असोसिएशन व इतर संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. भारतीय कृषक संघ, रयत संघ, शिवप्रति÷ान हिंदुस्थान, श्रीराम सेना हिंदुस्थान, शहर म. ए. समिती, महिला आघाडी, शिवसेना, यासह इतर संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. त्याचबरोबर सर्वच पदाधिकाऱयांनी त्यामध्ये भाग घेतला होता.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
शेतकऱयांचा मोर्चा म्हटला, की पोलिसांवर एक वेगळाच ताण येतो. सोमवारचा मोर्चा हा सर्व भाषिक शेतकऱयांचा होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कॉलेज रोडवरून भव्य असा मोर्चा निघाल्यानंतर पोलीसही तणावाखाली होते. प्रचंड मोर्चा असल्याने एक वेगळी भीती होती. मात्र शेतकऱयांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत मोर्चा काढून निषेध नोंदविला आणि सरकारची झोप उडविली.
शेतकऱयांच्या वाहनांचा ताफा सरदार्स मैदानावर
गावागावातून ट्रक्टर, टेम्पो व इतर वाहनांतून शेतकरी मोर्चासाठी दाखल झाले होते. मात्र वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे मोर्चामध्ये वाहने सहभागी करणे कठीण जाणार होते. त्यामुळे सरदार्स मैदानावर शेतकऱयांच्या वाहनांचा ताफा थांबविण्यात आला होता.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. शाम पाटील, ऍड. प्रसाद सडेकर, मनोज पावशे, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, आर. एम. चौगुले, एस. एल. चौगुले, रमाकांत कोंडुसकर, सिध्दगौडा मोदगी, आप्पासाहेब देसाई यांनी प्रयत्न केले.
या मोर्चामध्ये बांधकाम संघटनेचे अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, सुजित मुळगुंद, खानापूर तालुक्मयातील विलास बेळगावकर, माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश शिरोळकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, बबन मालाई, नेताजी जाधव, राजू मरवे, सरिता पाटील, किरण पाटील, मोहन बेळगुंदकर, ऍड. महेश बिर्जे, सूरज कणबरकर, बाळासाहेब काकतकर, सुहास किल्लेकर, अरुण कटांबले, राजू मायाण्णा, ऍड. रतन मासेकर, नारायण किटवाडकर, येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, उपाध्यक्ष राजू पावले, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रकाश अष्टेकर, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, दयानंद उघाडे, राकेश परीट, जोतिबा चौगुले, परशराम परीट, शिवाजी नांदूरकर, शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, परशराम घाडी, प्रदीप मुरकुटे, मधू पाटील, किरण धामणेकर, बाळकृष्ण पाटील, मधू बेळगावकर, विलास घाडी, शिवाजी कदम, कृष्णा शहापूरकर, ग्राम पंचायत सदस्या मनीषा घाडी, आनंद घाडी, प्रकाश मालुचे, एम. वाय. घाडी, महेश जुवेकर, संजय मंडलिक, आर. आय. पाटील, प्रवीण जाधव, बंडू केरवाडकर यांच्यासह म. ए. समिती व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
रेल्वेमार्गाला आणि हलगा-मच्छे बायपासलाही विरोध
बेळगाव शहरापासून 10 कि.मी.च्या अंतरामध्ये असलेल्या गावांमधील शेतजमिनीमधून रिंगरोडचा घाट घातल्यामुळे आता या परिसरातील शेतकरी भूमीहीन होणार आहेत. याचबरोबर रेल्वेमार्ग, हलगा-मच्छे बायपाससाठी देखील जोरदार विरोध करण्यात आला आहे. नंदिहळ्ळी तसेच खानापूर तालुक्मयातील गर्लगुंजी गावातील शेतकरी रेल्वेमार्गाला विरोध असल्याचे फलक घेऊन या मोर्चामध्ये सामील झाले होते. एकूणच रिंगरोड, हलगा-मच्छे बायपास आणि रेल्वेमार्गाला आपला विरोध असल्याचे दाखवून दिले आहे.