खानापूर तालुका म. ए. समितीचा इशारा : तहसीलदारांना निवेदन ः रस्ता दुरुस्त न झाल्यास 18 रोजी रास्तारोको करणार
वार्ताहर / खानापूर
खानापूर शहरांतर्गत जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावरील जांबोटी नाका ते गोवा कत्रीपर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. रुमेवाडी नाका परिसरात रस्ता दयनीय अवस्थेत असून येथील मार्गाची दुरुस्ती केली नाही तर रुमेवाडी नाक्मयावर 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रास्तारोको आंदोलनासह रस्त्यावरील खड्डय़ांत वृक्षारोपण करण्याचा इशारा तालुका म. ए. समितीच्यावतीने देण्यात आला आहे. गुरुवारी तहसीलदारांना यासंबंधीचे निवेदन माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी समिती कार्यकर्ते यशवंत बिरजे, आबासाहेब दळवी, नारायण कापोलकर, प्रकाश चव्हाण, रमेश धबाले, मऱयाप्पा पाटील, प्रभू कदम, सदानंद पाटील यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, खानापूर-रामनगर या शहरांतर्गत जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावरील जांबोटी कत्री ते ताराराणी हायस्कूल, मासळी मार्केट ते रुमेवाडी नाका परिसरात पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. जवळपास दोनशे फूट रस्त्यात खड्डे की खड्डय़ांत रस्ता अशी दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या भक्कम दुरुस्तीकडे महामार्ग प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत आहे. राष्ट्रीय पक्षांचे प्रतिनिधीही याबाबत मौन बाळगून आहेत. दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने दररोज अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. खड्डय़ांतून वाहने अडकण्याचे प्रकारही घडत आहेत. यासाठी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रशासनाचा निषेध नोंदवणार
हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असला तरी बायपास रस्त्याचे काम हाती घेतल्यानंतर या रस्त्यासाठी कोणताच निधी अथवा दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा, येत्या 18 जुलै रोजी तालुका म. ए. समितीच्यावतीने सकाळी 11 वाजल्यापासून रुमेवाडी नाका परिसरात आंदोलन छेडण्यात येईल. या ठिकाणी रास्तारोको करून खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध नोंदवला जाईल. याची नोंद शासनाने घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
निवेदन देताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, तालुक्मयात अनेक राज्यमार्ग तसेच खेडय़ापाडय़ांना जाणारे रोडरस्ते खराब झाले आहेत. अनेक भागात रस्त्यांची दुरुस्ती रखडली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. येत्या 18 तारखेपूर्वी ही दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
यशवंत बिर्जे यांनी शहरांतर्गत जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावर जांबोटी कृषी खात्याजवळ पडलेल्या खड्डय़ांचा प्रश्न उपस्थित करून कुणाचा तरी बळी गेल्यानंतर येथील खड्डा बुजवणार का, असा सवाल केला. शहरांतर्गत जाणाऱया संपूर्ण रस्त्याची व प्रमुख चौक असलेल्या ठिकाणची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली.
तहसीलदार बिदी यांनी निवेदनाचा स्वीकार करून संबंधित खात्याला सूचित करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रास्तारोकोसंदर्भात पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन देण्यात आले. येत्या 18 तारखेपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तालुक्मयातील तमाम समितीप्रेमी नागरिकांनी रुमेवाडी नाका येथे रास्तारोको आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.