माध्यमांनी आवाज उठवताच जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : सुवर्णसौधमधील वनविभागाशी झालेल्या बैठकीनंतर निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर तालुक्याच्या चिखले धबधब्यावर वनखात्याकडून पर्यटकांकडून प्रवेश फी म्हणून रुपये 290 वसुली करण्यात येत होती. ती वसुली न करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.वनखात्याच्या अधिकार्यांची बैठक घेऊन चिखले धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आर्थिक भुर्दंड ठरणारी अवैध पैसे वसुली करू नका असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यामध्ये चिखले धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. अशावेळी विकासाच्या नावाखाली पर्यटकांकडून प्रवेश फी घेणे चुकीचे असल्याने माध्यमांनी आवाज उठवताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तात्काळ दखल घेत ही कारवाई केली आहे.