उत्तर कर्नाटक-पश्चिम महाराष्ट्रात वाढत्या घटना : साधूंना केले जातेय लक्ष्य, ग्रामीण भागातील फिरते विपेतेही अडचणीत
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावसह उत्तर कर्नाटकातील वेगवेगळय़ा जिल्हय़ात मुले पळविणाऱया टोळीच्या संशयाने साधू व अनोळखींना अडवून त्यांना बांधून घालण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे. बेळगाव जिल्हय़ात तर पोलीस पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. प्रत्येक गावात याविषयी जागृती करण्यात येत आहे. दोन वर्षांनंतर पालघरची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे.
गेल्या आठवडय़ात गोकाक तालुक्मयातील कौजलगी येथे उत्तर प्रदेशमधील नागा साधूंचे वाहन अडवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ‘आम्ही अपहरणकर्ते नाही आहोत. नागा साधू आहोत. देवदर्शनासाठी निघालो आहोत’, अशी वारंवार विनंती करूनही जमाव त्या साधूंवर विश्वास ठेवत नव्हता. घटप्रभा पोलिसांनी त्यांची कसून चौकशी तसेच ओळखपत्रांची पडताळणी करून सुटका केली. ते अलीगढ व हाथरस जिल्हय़ातील राहणारे आहेत.
याच दरम्यान कित्तूर तालुक्मयातील मरिगेरी येथे चादरी विकण्यासाठी आलेल्या दोघा जणांना पकडून गावकऱयांनी त्यांची धुलाई केली आहे. मुले चोरण्यासाठी हे तरुण आपल्या गावात आले आहेत, या समजुतीने त्यांना कित्तूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी बेळगावच्या रुक्मिणीनगर येथे एका युवकाला वीजखांबाला बांधून मारहाण केल्याचा क्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
केवळ बेळगावच नव्हे तर धारवाड, बागलकोट, गदग आदी उत्तर कर्नाटकातील विविध जिल्हय़ात फिरते विपेते व साधूंना पकडून मारहाण करण्यात येत आहे. यासंबंधीच्या अफवा पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. परराज्यातील घटनांचे क्हिडिओ जणू आपल्याच गावात घडल्याचे भासविण्यात येत आहेत. त्यामुळेच नागरिक भयभीत झाले आहेत. या भीतीतून अनोळखींना संशयापोटी मारहाण होत आहे.
संशयास्पद व्यक्ती आढळल्यास संपर्क साधा
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी आदी वरि÷ अधिकाऱयांनी या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. गेल्या आठवडय़ात खानापूर तालुक्मयातील वेगवेगळय़ा गावातही अनोळखींना हटकण्यात आले आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जनजागृती हाती घेतली आहे. गावोगावी, गल्लोगल्ली फिरून जागृती केली जात आहे. मुलांचे अपहरण करणारी टोळी आली नाही. या केवळ अफवा आहेत. जर संशयास्पद व्यक्ती आढळून आली तर जवळच्या पोलीस स्थानकाला किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्या, अशी दवंडी पिटण्यात येत आहे.
खासकरून साधूंवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. कौजलगी येथील घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून अशा साधूंपासून सावध रहा, अशा अफवा पसरविण्यात येत आहेत. खरेतर बेळगाव जिल्हय़ात संकेश्वर येथील अपहरणाची एक घटना वगळता लहान मुलांच्या अपहरणाच्या कसल्याच घटना घडलेल्या नाहीत. तरीही गेल्या आठ दिवसांपासून अफवांचे पीक येतच आहे. ऑनलाईन अफवांना गल्लोगल्ली, गावोगावी फिरून ऑफलाईन उत्तरे दिली जात आहेत.
पोलीस दलात बीट व्यवस्था कार्यरत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळय़ा गावांवर, परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरात 379 बीटमधील 431 व्हॉट्सऍप ग्रुपवर अफवा खोडून काढण्याचे संदेश व जिल्हा पोलीसप्रमुखांचे निवेदन असलेले व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. दीड लाखाहून अधिक नागरिकांपर्यंत पोलिसांनी हे संदेश पोहोचविले आहेत.
आठवडी बाजार, गावातील प्रमुख ठिकाणे, मंदिरे आदी ठिकाणी अधिकारी व पोलीस जागृती करीत आहेत. महिला व गावातील प्रमुखांना यासंबंधीचा माहिती देण्याचा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे बनावट व्हिडिओ व संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले जात आहे.
16 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्हय़ातील गडचिंचले येथे गुजरातला निघालेल्या दोन साधूंचे वाहन अडवून त्यांच्या वाहनचालकासह तिघांचीही हत्या करण्यात आली. देशभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारवर रोष व्यक्त करण्यात आला होता. गेल्या आठवडय़ात जत, जिल्हा सांगली येथील लवंगा गावाजवळ साधूंना बेदम मारहाणीची घटना घडली. उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रात मुले पळविणाऱया टोळीविषयी जोरदार अफवा पसरविण्यात येत आहेत.
कायदा हाती घेऊ नका
रविवारी धारवाड जिल्हय़ातील करडीगुड्ड येथे एका तरुणाला वीजखांबाला बांधून मारहाण करण्यात आली आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मानसिक अस्वस्थ, फिरते विपेते, चादरी विपेते, तीर्थाटनाला निघालेले साधू जमावाचे लक्ष्य बनत आहेत. वाढत्या अफवांच्या पार्श्वभूमीवर पालघरची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिसांनी काळजी घेतली आहे. कायदा हाती घेऊ नका, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती द्या किंवा 112 क्रमांकावर कळवा, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे.
शहानिशा आवश्यक…
सध्या वाढत्या अफवांमुळे फिरत्या विपेत्यांना आपला व्यवसाय करणे कठीण होत आहे. एखाद्या गावात अफवेमुळे एखाद्या विपेत्याला अडविले तर त्याच्याभोवती जमाव जमतो. प्रत्येकजण वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून त्या व्यक्तीला हैराण करतात. त्यामुळे साहजिकच ती व्यक्ती योग्य उत्तरे देऊ शकत नाही. तो घाबरलेला असतो. घाबरून निरुत्तर झाला, की जमावाचा संशय आणखी वाढतो. त्याच्यावर हल्ल्याचे प्रकार घडतात. कायदा हातात घेण्याचा हक्क जमावाला नसून त्याऐवजी पोलिसांशी संपर्क साधणेच योग्य! पोलीस त्यांची योग्य शहानिशा करून निर्णय घेतील. पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने या अफवा पसरविणाऱयांचा शोध घेणेही गरजेचे आहे.