प्रतिनिधी/ म्हापसा
विविध घटनेच्या पदाधिकाऱयांनी संजय बर्डे यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक जिवबा दळवी यांची भेट घेऊन बार्देश तालुक्यात आणि खास करून म्हापशात झालेल्या विद्यार्थी अपहरण प्रकरणाचा छडा लावावा तसेच या भागात गुंडागर्दी वाढली असून त्याकडे लक्ष देऊन आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली.
म्हापशात अपहरण झालेच नाही ती सर्व अफवा आहे तसेच गुंडागर्दीवर आळा घालण्यात येईल असे आश्वासन दळवी यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात प्रकाश शिंदे, सितेश मोरे, महेश बर्डे, प्रशांत शेट, दिपेश कृष्णनाथ नाईक, अनिल केरकर, रामदास मोर्जे, प्रवीण आसोलकर, संजय तिवरेकर, सिताराम कुडाळकर आदींचा समावेश होता.