सत्तरी तालुक्मयातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा
प्रतिनिधी /वाळपई
गेल्या चार दिवसांपासून सत्तरी तालुक्मयान अनेक परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पावसामुळे नदीचे पाणी गढुळ झालेले आहे. यामुळे दाबोस पाणी प्रकल्प यंत्रणेवर ताण येत आहे. यामुळे पाणीपुरवठय़ावर परिणाम होत आहे. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळेही पाणीपुरवठय़ात अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत तक्रारीमध्ये वाढ झालेली आहे. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी पर्यंत पाणीपुरवठा पूर्वपदावर होईल, असा दावा दाबोस पाणी प्रकल्पाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.
चार दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे म्हादई नदीचे पाणी गढूळ झाले आहे. या नदीच्या पाण्याचा पुरवठा दाबोस प्रकल्पाल होत असतो. पाणी गढूळ होत असल्यामुळे दाबोस प्रकल्पाच्या शुद्धीकरण यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. अपेक्षित प्रमाणात पाणी शुद्ध होत नसल्यामुळे पिण्याचे पाण्याच्या पुरवठय़ावर परिणाम होतो, असे अधिकाऱयांना स्पष्ट केले आहे.
याचा भिरोंडा पंचायत क्षेत्रात परिणाम होऊन पाणी समस्या निर्माण झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची आशा अधिकारी वर्गाने व्यक्त केलेली आहे.
दरम्यान, पावसासह वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणी प्रकल्पावर परिणाम होताना दिसत आहेत. याचा पाणीपुरवठय़ावर परिणाम होतो. यामुळे सत्तरी तालुक्मयातील अनेक भाक्गात पाण्याची समस्या असल्याचे संबंधित अधिकाऱयांनी स्पष्ट केले.