पणजी ; भाजप हा पक्ष ग्रामोदय, अंत्योदय विचारधारेची कास धरणाला पक्ष आहे. पुढील 25 वर्षांच्या वाटचालीचा विचार करून सरकारकडून काम सुरू आहे. प्रत्येक जनतेला कोणताही कराचा बोजा न देता योजनाबद्ध आर्थिक धोरणाला महत्त्व देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, याद्वारे जनतेचा विकास साधला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, अर्थसंकल्पात अनेक प्रभावी योजना राबविण्यात आल्या असून, त्याद्वारे जनतेचा विकास साधला जाणार आहे. जनतेला कोणत्याही प्रकारचा कराचा बोजा ठेवण्यात आला नाही. विरोधक हे केवळ जनतेची दिशाभूल करण्यातच धन्यता मानतात. परंतु गोव्यातील जनता सुज्ञ असल्याने ते आमच्या पाठिशी आहेत आणि त्यामुळेच आम्ही केंद्राच्या भक्कम सहकार्याने हा विकास साधत आहोत. यंदाचा अर्थसंकल्प योजनाबद्ध असून,यामध्ये केवळ जनतेच्या भल्याचा विचार करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
Previous Articleकागवाडजवळ 70 लाख रुपये जप्त
Next Article सर्वस्पर्शी अर्थसंकल्प
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.