प्रतिनिधी /म्हापसा
बार्देश तालुक्यात पाच व सात दिवसाच्या गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. यंदा कोविडचा तेवढा प्रभाव नसल्याने तसेच वरुण राजाने आपली कृपादृष्टी दाखविल्याने विसर्जनाला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
घरोघरी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. गावागावात पताका लावण्यात आल्या होत्या. सर्वत्र रांगोळी, सजावट करून गणपतीच्या मिरवणुका बाहेर काढण्यात आल्या. काही ठिकाणी टाळ मृदुंगाच्या मिरवणुका, काही ठिकाणी गजर घालीत भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. सोबत डीजेही लावण्यात आले होते. म्हापसा तार नदीच्या पात्रात म्हापसा मतदारसंघातील बहुतेक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. इतर ठिकाणी आपापल्या वाडय़ात तळीच्या ठिकाणी विद्युत रोषणाई आणि सौंदर्यीकरण करण्यात आले होते. तेथेही श्रीचे विसर्जन मोठय़ा उत्साहात करण्यात आले.