बदलत्या हवामानाचा फटका, काही ठिकाणी मोहोर बहरला
प्रतिनिधी/ बेळगाव
काजू उत्पादनाला प्रारंभ झाला आहे. मात्र यंदा काही ठिकाणी बदलत्या हवामानाचा परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. सध्या सकाळी व रात्री थंडी कायम आहे. तर दुपारी उष्मा वाढू लागला आहे. त्यामुळे बहरलेला मोहोर करपून जात आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
काही भागात मोहोर बहरून आला आहे. शिवाय समाधानकारक उत्पादनाला प्रारंभ झाला आहे. तर काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात फळधारणा दिसून येत आहे. मध्यंतरी काजूच्या झाडावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यानंतर काही भागात काजूला मोहोर आला आहे. मात्र बदलते हवामान आणि इतर कारणामुळे लागवडदेखील लांबणीवर पडली आहे. काही भागात काजू फळधारणेला सुऊवात झाली असून काही ठिकाणी अद्याप झाडांना मोहोरदेखील आला नाही.
अलीकडे काजू बागायत क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनात वाढ झाली आहे. पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, बडस, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, बाकनूर, तुरमुरी, बाची, कुद्रेमनी, कल्लेहोळ, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते आदी भागात काजू उत्पादन होते. यातील बहुतांश गावांमध्ये काजू फळधारणेला सुऊवात झाली आहे. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
अलीकडच्या काही वर्षात काजुला समाधानकारक भाव मिळू लागला आहे. कोकणातील उत्तम दर्जाची रोपे आणून लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे काजू क्षेत्र वाढले आहे. विशेषत: खानापूर तालुक्मयातदेखील काजू उत्पादन अधिक प्रमाणात होते. डोंगर आणि लाल जमिनीत काजू लागवडीला पसंती दिली जाते. तर काही ठिकाणी काजू मोहोर संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून औषध फवारणीची कामेदेखील हाती घेण्यात आली आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे काजू विक्रीचा प्रŽ उत्पादकांसमोर निर्माण झाला होता.