प्रतिनिधी/ रत्नागिरी
पुढील दोन ते तीन दिवसात उत्तर व दक्षिण कोकणात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट व सोसाटय़ाच्या वाऱयासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार दक्षिण कोकणात 15 मार्च रोजी हलक्या ते मध्यम पावसासह 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 16 मार्च रोजी दक्षिण कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावल्यास आंब्यासह काजू पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच वातावरण बदलाचा फटका झेलणाऱया जिह्यातील बागायतदार व शेतकऱयांसमोर यामुळे नवे संकट ओढवण्याची भिती व्यक्त होत आहे.