शिक्षणाधिकाऱयांच्या नियोजनाला मिळाले यश : निकालातील घसरण रोखण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही वर्षात अधिकाऱयांच्या मनमानी कारभारामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाच्या दहावीच्या निकालात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे निकालाबाबत चिंता व्यक्त करत असतानाच नव्या शिक्षणाधिकाऱयांनी केलेल्या सुसूत्रबद्ध नियोजनामुळे यावषी शैक्षणिक जिल्हय़ाच्या निकालात मोठी वाढ झाली. निकालाची हीच परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी आता अधिकाऱयांसह शिक्षकांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत.
काही वर्षांपूर्वी दहावीच्या निकालात राज्यात पहिल्या 10 क्रमांकामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हा असायचा. मध्यंतरी 3 ते 4 वर्षांत मात्र कमालीची घसरण झाली. जिल्हा शिक्षणाधिकाऱयांचे नियोजन फोल ठरल्याने त्याचा फटका निकालावर जाणवला. एकीकडे चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल वाढत असताना दुसरीकडे मात्र बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल घसरत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.
2019-20 या शैक्षणिक वर्षात सर्वात कमी निकाल लागला. त्यावषी केवळ 62.88 इतका मागील दहा वर्षांचा सर्वात नीचांकी निकाल होता. अधिकाऱयांचा मनमानी कारभार, शिक्षक व संस्थांवरील निसटलेली पकड, नियोजनाचा अभाव या सगळय़ाचा परिणाम त्या वषीच्या निकालावर जाणवला. मागील 2 वर्षांत कोरोनामुळे नियमित पद्धतीने परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या सर्वांनाच उत्तीर्ण करण्यात आले होते.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात बदली होऊन आलेले शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी पहिल्या दिवसापासूनच दहावी परीक्षेचा निकाल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी विभागवार बैठका घेऊन निकाल कसा वाढेल यासाठी नियोजन सुरू केले होते. यामुळेच यावषी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल 62 टक्मयांवरून 87.80 टक्क्मयांवर पोहोचला. शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण विभागातील कर्तव्यदक्ष अधिकाऱयांमुळे निकाल वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.