चार महिन्यात 100 ठिकाणी लागली आग : खबरदारी घेणे गरजेचे : 26 लाखांचे नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
उन्हाळय़ाला सुरुवात झाली आणि आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. एका दिवसात चार ते पाच ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडले. एक-दोन घटना वगळता लहान घटनांची संख्या सर्वाधिक आहे. या चार महिन्यात आग लागून 26 लाख 71 हजार 400 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यामुळे आग लागू नये, याची खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.
जानेवारीपासून ऊन वाढताच आग लागण्याच्या घटना वाढल्या. शॉर्टसर्किट होऊन अनेक घरांना व दुकानांना आग लागली आहे. बऱयाचवेळा जुन्या वायरिंगकडे दुर्लक्ष केल्याने त्या निकामी होऊन आग लागते. याचबरोबर माळावर कचरा पेटविण्याच्या नादात आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. काही विघ्नसंतोषी लोक मुद्दाम काही ठिकाणी आग लावतात. यामध्ये केवळ साहित्याचेच नुकसान होत नाही तर आजूबाजूची वनसंपदा, वन्यजीवांचा बळी जातो.
गादी कारखान्याला लागलेली आग सर्वात मोठी
यावषी आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या असल्या तरी किल्ला तलावानजीक गादी कारखान्याला लागलेली आग सर्वात मोठी होती. दुकानात गाद्या, कापूस, कापड, दोरा यांना आग लागल्यामुळे दिवसभर ही आग आटोक्मयात आली नव्हती. त्याचवेळी शहराच्या इतर भागातही आग लागल्याने अग्निशमन विभागाचे बंब अपुरे पडत होते. अखेर सांबरा येथील एअरफोर्सचा अग्निशमन बंब मागविण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करून ही आग विझविली होती.
आगीच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी आवश्यक
वाढत्या उष्म्यामुळे मागील चार महिन्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामध्ये बऱयाच साहित्याचे नुकसान झाले होते. आग लागण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी पूर्व खबरदारी घेणे गरजेचे आहे. गवतगंज्या घालताना बाजूचे लहान गवत कापणे, दुकान, घर यांच्या वीजव्यवस्थेची तपासणी करणे गरजेचे आहे.
– व्ही. एस. टक्केकर (स्टेशन अधिकारी-अग्निशमन विभाग)
या उपाययोजना गरजेच्या
- जमिनीपासून 15 फुटांवर टॅक्टरमध्ये गवत भरू नये.
- गवत वाहतूक करताना ट्रक्टरवर झोपू नये.
- घरातील वायरिंग, एलपीजी सिलिंडर यांची देखरेख करावी.
- गवतगंज्यांच्या बाजूने असलेले गवत कापावे.
एका दृष्टीक्षेपात
- एकूण घडलेल्या घटना – 100
- झालेले नुकसान- 26 लाख 71 हजार 400
- वाचविण्यात आलेली मालमत्ता- 1 कोटी 63 लाख 52 हजार 600
- जखमींची संख्या – 1
- मृत्युमुखी पडलेली जनावरे – 10