भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. विजय मिळविण्यासाठी दोन्ही संघानी कसून तयारी केली आहे.
पहिला सामना उद्या संध्याकाळी ७ वाजता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना 12 जून रोजी कटकमध्ये, तिसरा सामना 14 जूनला विशाखापट्टणममध्ये, चौथा सामना 17 जून रोजी राजकोटमध्ये आणि शेवटचा सामना 19 तारखेला बेंगळुरमध्ये खेळवला जाईल. भारतीय संघाचा कर्णधार के. आले. राहुल असेल तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.