निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली
अनुकूल जलवायू परिस्थितीच्या कारणास्तव भारत जागतिक पातळीवरील हरित हायड्रोजनचा सर्वात स्वस्त उत्पादक होऊ शकतो, असे प्रतिपादन निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले आहे. ‘रायसीना डायलॉग’ क्रार्यक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारत जगामध्ये हरित हायड्रोजनचा सर्वात स्वस्त उत्पादक होऊ शकतो. कारण देशामध्ये अनुकूल जलवायूच्या कारणास्तव हा बदल होत जाणार असल्याचे संकेत आहेत. यावेळी कांत यांनी सांगितले आहे, की चीनमध्ये अनुकूल जलवायू नाही ज्याच्यामुळे हरित हायड्रोजनचे स्वस्त उत्पादन घेत भारताला पश्चिम आशियातील देशांना प्रतिस्पर्ध्यांसोबत स्पर्धा करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.