कोल्हापूर प्रतिनिधी :
सुमारे २०० वर्षांपूर्वी,भारत आणि नेपाळमधील सीमा म्हणून हि नदी निश्चित केली गेली. नदीचा पूर्व भाग हा एका देशाचा आणि पश्चिमेकडील भाग दुसऱ्या देशाचा अधिकार क्षेत्र मानला जातो. पण नदीच्या पाण्याचा बदलता प्रवाह आता या दोन देशात वादाचे कारण बनला आहे.
नेपाळमध्ये नारायणी आणि भारतात गंडक म्हणून हि नदी ओळखली जाते. जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतशी नदीने आपला मार्ग बदलण्यास सुरुवात केली आणि काही वर्षांत ती पूर्वेकडील भागात वाहू लागली. त्यामुळे नदीच्या पूर्वेकडील एक क्षेत्र हळूहळू नदीच्या पश्चिम टोकाला आले आणि विवाद सुरु झाला
दोन्ही देशांत सीमावाद निर्माण झाला जो आजतागायत सुटलेला नाही. भारत-नेपाळ या दोन्ही देशांमधील वाहणाऱ्या या नदीमुळे जो विवादात भाग तयार झाला आहे त्यावर नेपाळ आणि भारत या दोन्ही देशांनी दावा केला आहे.