अझरबैजानच्या अध्यक्षांची दर्पोक्ती ः मोदी सरकारचे पाऊल मैत्रीच्या विरोधात
वृत्तसंस्था/ येरेवान
नागर्नो-काराबाख वाचविण्यासाठी युद्ध लढत असलेल्या आर्मेनियाला पिनाका रॉकेट आणि किलर क्षेपणास्त्रांसह 2 हजार कोटी रुपयांची घातक शस्त्रास्त्रs देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे अझरबैजानचे अध्यक्ष बिथरले आहेत. आर्मेनियाला कुठल्याही प्रकारच शस्त्रास्त्रs दिली तरीही तो देश नागार्नो-काराबाख वाचवू शकणार नाही. अनेक देश आर्मेनियाला शस्त्रास्त्रs देण्याची तयारी करत असून यात दुर्दैवाने भारतही सामील आहे. आम्ही भारताच्या या निर्णयाला मैत्रीच्या विरोधातील मानत असल्याचे उद्गार अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलियेव्ह यांनी काढले आहेत.
आर्मेनियाला शस्त्रास्त्रs पुरवूनही वाचविता येणार नाही, आर्मेनियालाही मी हे अनेकदा कळविले आहे. तुम्ही पैशांची नासाडी करू नका. सर्वप्रथम आर्मेनियाला कुणी मदत करणार नाही, याचबरोबर या शस्त्रास्त्रद्वारे आर्मेनियातील सूड उगवू पाहणाऱया शक्तींमध्ये स्वतःबद्दल भ्रम तयार होईल. अझरबैजानचा सूड उगवता येईल असा हा भ्रम असेल, परंतु हे त्याला करता येणार नसल्याचा दावा इल्हाम अलियेव्ह यांनी केला आहे.
जर आम्हाला आर्मेनियाकडून गंभीर धोका जाणवला तर आम्ही त्याला तत्काळ सामोरे जाऊ. धोका कुठून निर्माण होतोय हे आम्ही पाहणार नाही. हा धोका आमच्या भूमीतून (नागार्नो-काराबाख) का आमच्या सीमेबाहेरून निर्माण होतोय हे आम्ही पाहणार नाही. असे करणे आमचा घटनात्मक अधिकार आहे. अनेक देश आर्मेनियाला शस्त्रास्त्रs पुरविण्याची तयारी करत असल्याचे आम्ही पाहिले आहे. दुर्दैवाने भारत देखील आता यात सामील झाला आहे. आम्ही याला मैत्रीच्या विरोधातील पाऊल मानत आहोत. भारताने पुरविलेली शस्त्रास्त्रs आक्रमक असून त्यांचे एकमात्र लक्ष्य अझरबैजान असल्याचे इल्हाम यांनी म्हटले आहे.
आर्मेनिया आमच्यासाठी कधीच धोका ठरू नये यादृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत असे अझरबैजानच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. भारत आणि आर्मेनिया यांच्यात 2 हजार कोटी रुपयांचा शस्त्रास्त्र पुरवठा करार झाला आहे. याच्या अंतर्गत भारत स्वतःची अत्यंत घातक पिनाका रॉकेट लाँचर, रणगाडाविरोधी रॉकेट आणि अनेक प्रकारची विस्फोटके पुरविणार आहे. भारत पहिल्यांदाच आर्मेनियाला घातक शस्त्रास्त्रs देणार आहे. यापूर्वी भारताने आर्मेनियाला स्वाती रडार यंत्रणा पुरविली होती. या रडारच्या मदतीने अझरबैजानने डागलेल्या तोफगोळय़ांचा माग काढता येत होतो. भारताने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर हा रडार तैनात केला आहे. अझरबैजानने काही दिवसांपूर्वी आर्मेनियाच्या नियंत्रणातील भूभागावर आक्रमण करत तो ताब्यात घेतला होता. अझरबैजानला तुर्किये आणि पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत आहे.