वृत्तसंस्था/ नागपूर
कतारमध्ये सुरू असलेल्या फिबाच्या 16 वर्षांखालील वयोगटातील आशियाई बास्केटबॉल चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पहिल्यांदाच शेवटच्या आठ संघांत स्थान मिळवून नवा इतिहास घडविला.
भारताच्या 16 वर्षांखालील मुलांच्या संघाने शुक्रवारी झालेल्या सामन्यात इंडोनेशियाचा 97-53 असा पराभव केला. भारतातर्फे लोकेंद्र सिंगने 30, जयदीप राठोडने 27, कुशल सिंगने 26 आणि हर्ष दागरने 11 बास्केट्स नोंदविले. भारताने हा सामना 97-53 (20-18, 23-11, 27-8, 27-16) अशा गुणांनी जिंकला. आशिया खंडातील या स्पर्धेत भारताने 2009 साली 10 वे स्थान मिळविले होते.