वृत्तसंस्था/ कोलंबो
अन्नधान्यांच्या अभूतपूर्व टंचाईमुळे ग्रासलेल्या श्रीलंकेला भारताने पाठविलेले मानवता साहाय्य त्या देशात पोहोचले असल्याची माहिती तेथील प्रशासनाने दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले भारतीय जहाज कोलंबो बंदरात पोहोचले आहे. या जहाजात तांदूळ, औषधे आणि दुधाची भुकटी अशा वस्तूंचा समावेश आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या जहाजाला हिरवा झेंडा दाखविला होता. चेन्नई बंदरातून बुधवारी ते रवाना झाले. मानवता तत्वावर केलेल्या या साहाय्यतेच्या पहिल्या फेरीत 9 हजार टन तांदूळ, 200 टन दुधाची भुकटी, 24 टन जीवबचाव औषधे असा साधारणपणे 45 कोटी रुपयांचा ऐवज असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. रविवारपर्यंत आणखी मदत पोहोचण्याची शक्मयता आहे.
विश्व समुदायाकडे मागणी
श्रीलंकेच्या प्रशासनाने विश्व समुदायाकडे साहाय्याची मागणी केली आहे. लवकर अन्नधान्यांची मदत न पोहोचल्यास नागरिकांवर उपाशी मरण्याची वेळ येईल, असा निर्वाणीचा इशारा रानिल विक्रमसिंघे यांच्या कार्यालयातील अधिकाऱयांनी दिला. श्रीलंकेला तातडीने तांदूळ आणि भाजीपाल्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. सर्वप्रथम भारताकडून साहाय्यता पोहोचली आहे.