ब्रुसेल्स / वृत्तसंस्था
भारत आणि युरोपियन युनियन (इयू) यांनी आठ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित व्यापार आणि गुंतवणूक करारासाठी पुन्हा चर्चा सुरू केली. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये हा संवाद झाला. द्वयींमधील महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारासाठीच्या वाटाघाटी 2013 मध्ये स्थगित करण्यात आल्या होत्या. युरोपियन युनियनने भारताशी मुक्त व्यापार करारासाठी औपचारिकपणे चर्चा सुरू केली आहे, असे ‘इयू’चे व्यापार आयुक्त वाल्डिस डोम्ब्रोव्स्की यांनी सांगितले. भारताचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे ब्रुसेल्समध्ये चर्चेसाठी स्वागत करताना मला आनंद होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.