वृत्तसंस्था/ लॉडेरहिल (फ्लोरिडा)
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत विंडीजवर 3-1 अशी विजयी आघाडी मिळविली. शनिवारी येथे झालेल्या या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने विंडीजचा 59 धावांनी पराभव केला. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज आवेश खानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. रोहित शर्माने कर्णधारपद भूषविताना टी-20 प्रकारातील आपली अपराजित घोडदौड कायम राखली आहे.
शनिवारच्या चौथ्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 5 बाद 191 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा डाव 19.1 षटकात 132 धावात आटोपला.
कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या सलामीच्या जोडीने संघाच्या डावाला चांगली सुरुवात करताना 4.4 षटकात 53 धावांची भागीदारी केली. अकिल हुसेनने रोहित शर्माचा त्रिफळ उडविला. त्याने 16 चेंडूत तीन षटकार आणि 2 चौकारासह 33 धावा जमविल्या. विंडीजच्या जोसेफने यादवला पायचित केले. त्याने 14 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 24 धावा जमविल्या. दीपक हुडा आणि पंत या जोडीने धावांची गती बऱयापैकी राखत तिसऱया गडय़ासाठी 47 धावांची भर घातली. जोसेफने हुडाला किंगकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 19 चेंडूत 2 चौकारासह 21 धावा जमविल्या. मॅकॉयने पंतला झेलबाद केले. त्याने 31 चेंडूत 6 चौकारासह 44 धावा जमविल्या. संजू सॅमसनने अक्षर पटेल समवेत सहाव्या गडय़ासाठी उपयुक्त भागीदारी केल्याने भारताला 20 षटकात 5 बाद 191 धावापर्यंत मजल मारता आली. दिनेश कार्तिक 6 धावावर बाद झाला. संजू सॅमसनने 23 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 30 तर अक्षर पटेलने 8 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 20 धावा जमविल्या. भारताच्या डावात 8 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे मॅकॉय 2 आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 2 तर अकिल हुसेनने एक गडी बाद केला. भारताने 191 धावापर्यंत मजल मारली पण एकाही फलंदाजाला अर्धशतक नोंदविता आले नाही.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अचूक आणि भेदक गोलंदाजी तसेच चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारताने विंडीजला 19.1 षटकात 132 धावात उखडले. विंडीजच्या डावात कर्णधार पुरनने 8 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 24, पॉवेलने 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 24, हेटमेयरने 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 19, होल्डरने 9 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13, किंगने 3 चौकारासह 13 तर मेयर्सने 2 चौकारासह 14 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 7 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे अर्षदीप सिंगने 12 धावात 3, आवेश खानने 17 धावात 2, अक्षर पटेलने 48 धावात 2, बिस्नॉयने 27 धावात 2 गडी बाद केले. भुवनेश्वरकुमार प्रभावी ठरला नसला तरी आवेश खान आणि अर्षदीप सिंग यांनी भेदक गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकात 5 बाद 191 (रोहित शर्मा 33, सूर्यकुमार यादव 24, हुडा 21, पंत 44, सॅमसन नाबाद 30, अक्षर पटेल नाबाद 20, दिनेश कार्तिक 6, मॅकॉय 2-66, जोसेफ 2-29, अकिल हुसेन 1-28), विंडीज 19.1 षटकात सर्व बाद 132 (पुरन 24, पॉवेल 24, हेटमेयर 19, मेयर्स 14, किंग 13, होल्डर 13, अर्षदीप सिंग 3-12, आवेश खान 2-17, अक्षर पटेल 2-48, रवि बिस्नोई 2-27).