वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यादरम्यान दोन्ही देशांच्या सैन्यात तणावपूर्ण स्थिती होती. मात्र या वातावरणातही जानेवारी ते मार्च तिमाहीत दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार 15.3 टक्क्यांनी वाढून 31 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
भारताला चीनने 27.1 अब्ज डॉलर्सची निर्यात व 4.87 अब्ज डॉलर्सची आयात केल्याची नोंद आहे. याचदरम्यान व्यापारी तूट मात्र वधारुन 22.23 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. मागील वर्षात भारत व चीन व्यापार 125 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकचा होत विक्रमी टप्प्यावर राहिला होता.
भारताची आयात 28 टक्क्यांनी वाढली
मागील तीन महिन्यांमध्ये चीनमधून भारताची आयात वर्षाच्या आधारावर 28.3 टक्क्यांनी वाढल्याच्या तुलनेमध्ये भारताची साखर निर्यात वर्षाच्या आधारे 26.1 टक्क्यांनी घसरली असल्याचे सांगितले जाते.