प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेतील रहिवासी या नात्याने सध्या कुडचडेची जी दुर्दशा झाली आहे त्याबद्दल आपल्याला खंत वाटते. हल्लीच आपण कुडचडेत सुरू होणाऱया कचरा प्रकल्पासंबंधी प्रसारमाध्यमांतून बोललो होतो. त्यात विविध मुद्यांवर सविस्तर माहिती दिली होती. तरी स्थानिक आमदारांनी स्वतःकडून झालेल्या चुकांवर पडदा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एक विरोधक म्हणून सामान्य जनतेला भेडसावणाऱया अडचणी व सरकारकडून होत असलेल्या चुका समोर आणण्याच्sा कर्तव्य आपण बजावत आहे, असे नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनीपत्रकार परिषद घेऊन सांगितले.
कचरा प्रकल्पासंबंधी आमदारांनी सांगितले होते की, एकूण चार तालुक्यांतील कचरा कुडचडेत आणला जाणार. त्यावेळी या निर्णयाला विरोध झाला होता. पण त्यांना यासंबंधी विचारले असता त्याचे कारणही त्यांनी सांगितले होते. सदर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी 100 टन कचऱयाची गरज भासणार असल्यामुळे आणि कुडचडेतील कचरा 100 टन होण्याच्या शक्यता कमी असल्यामुळे इतर तालुक्यांतून कचरा आणावा लागेल असे त्यांनी सांगितले होते. त्याचवेळी त्यांनी यात कचरा विलगीकरण करण्यासाठी कोणत्याच मनुष्यबळाचा वापर होणार नाही असे सांगितले होते, याकडे होडारकर यांनी लक्ष वेधले.
पण हल्लीच सदर कचरा प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली तेव्हा विलगीकरण करणासाठी मनुष्यबळ वापरण्यात आल्याचे दिसून आले. यावर प्रश्न विचारले असता आमदारांनी दुसरेच उत्तर देऊन विषय बदलला, असे होडारकर म्हणाले. सर्वांना माहिती आहे की, सुरुवातीला याच आमदाराने कुडचडे मतदारसंघातील लोकांना कचरा कर लावण्यात येणार नाही असे सांगितले होते. पण तो कर लावण्यात आला व सध्या दुप्पट करण्यात आलेला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.