प्रतिनिधी /बेळगाव
आचारसंहिता लागू झाली असली तरी आचारसंहितेचे पालन करीत गुरुवंदन कार्यक्रम करण्यास कोणतीही अडचण नाही, असे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱयांनी गुरुवंदनेची पूर्ण माहिती संयोजक किरण जाधव यांच्याकडून जाणून घेतली. त्याचबरोबर कार्यक्रमसंबंधी जागृती करणारे फलक आहेत. त्यावर राजकीय नेत्यांची छायाचित्रे असल्यास ते फलक हटविण्याच्या सूचना केल्या. गुरुवंदन कार्यक्रमाचे फलक लावण्यास कोणती अडचण नसल्याचे नमूद केले. यावेळी सकल मराठा समाजाचे अनंत लाड, सुनील जाधव व अन्य उपस्थित होते.