रोहयोसह विविध विषयांवर चर्चा : तलाव कामांची अधिकाऱयांकडून प्रशंसा
वार्ताहर /कडोली
तालुका दौऱयावर आलेल्या केंद्रीय पथकाने कडोली (ता. बेळगाव) येथे भेट दिली. रोहयोतून कामे देण्यासाठी ज्याप्रकारे अधिकाऱयांची धडपड सुरू आहे त्याचप्रकारे कामगारही काम करत आहेत की नाही याची पाहणी करण्यात आली. ग्राम पंचायतीला भेट देवून यावेळी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. बेळगाव तालुक्मयासह इतर गावांनाही या पथकाने भेट दिली होती.
जिल्हा पंचायतचे प्रकल्प अधिकारी रवी बंगारप्पण्णावर, तालुका पंचायतचे सहाय्यक सचिव राजेश मोरबद, नागराज यरगुद्दी यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. एकीकडे पाणी पातळी घटत चालली असून ही समस्या भविष्यात धोका निर्माण करणारी आहे. यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारने विविध योजना राबवून पाणी जमिनीत कसे झिरपता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे केंद्रीय पथकाकडून तालुका दौरा करण्यात आला होता. याचाच एक भाग म्हणून कडोली येथेही कामांची पाहणी केली
आहे.
बेळगाव तालुक्मयातील विविध भागांमध्ये पाणी अडविण्याच्या दृष्टिने आता मोठय़ा प्रमाणात पाऊल उचलण्यात येत आहे. तालुक्मयातील सर्वात अधिक कामगार हे कडोली ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळेच त्यांनी पाहणी करून कडोली येथील रोहयो कामगारांकडून समस्या जाणून घेतल्या. याचबरोबर सरकारकडून ज्या सुविधा उपलब्ध होतात त्या मिळतात की नाही याची पाहणीही केली आहे. याचबरोबर ग्राम पंचायतीला भेट देवून विविध कामांबाबत त्यांनी चौकशी केली आहे. तालुक्मयात तलावांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एका तलावाचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसरा तलाव खोदाई करण्यासाठीचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत कडोली येथे चार ते पाच तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम करण्यात आले आहे.
त्यामुळे येथे पाहणी करून केंद्रीय पथकाने कामांची प्रशंसा केली आहे. यावेळी ग्राम पंचायतीमध्ये भेट देवून विविध अधिकाऱयांकडून माहिती जाणून घेतली.