केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री गोयल यांचा विश्वास
सॅन फ्रान्सिस्को
गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीने 675 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे आणि आता देश 2030 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार 2000 अब्ज डॉलरचा टप्पा पार करण्याचे ध्येय निश्चित करणार असल्याचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक सदस्य, संशोधक आणि विद्यार्थ्यांशी बोलताना गोयल म्हणाले की, 2047-2050 पर्यंत, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा सामान्य परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था किमान 30,000 अब्जची असेल आणि सरकारच्या योजना कार्यान्वित झाल्यास, अर्थव्यवस्था किमान 35,000 ते 45,000 अब्ज डॉलरवर पोहचेल असा दावाही त्यांनी याप्रसंगी केला आहे.
3300 अब्जच्या जीडीपीसह, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. या यादीत अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी पुढे आहेत.
निर्यात प्रथमच 675 अब्ज डॉलरच्या घरात
आमची वस्तू आणि सेवांची निर्यात प्रथमच 675 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. 2030 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार 2000 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढणार असल्याचेही गोयल यांनी यावेळी म्हटले आहे.