राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे उभारलेला छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून त्वरित पुतळा उभारावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नौदलदिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र पुतळा उभारुन काहीच दिवस झाले असताना पुतळा कोसळला आहे. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पुतळा कोसळण्यामागचे कारण तपासण्यात यावे व याची सखोल चौकशी करण्यात यावी. त्या ठिकाणी त्वरित नवीन पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जोतिबा चव्हाण पाटील, अल्ताफ सनदी, भारती खाडे, रेश्मा माळगी आधी कार्यकर्ते उपस्थित होते.