नवी दिल्ली
भारतीय भांडवली बाजारातील नोट्स (पी-नोट्स) द्वारे गुंतवणूक सलग तीन महिने घसरल्यानंतर यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस 84,810 कोटी रुपयांवर गुंतवणूक पोहोचली आहे. कच्चेतेल आणि वस्तूंच्या किमती नरमल्याने गुंतवणूक वाढली आहे.
सेबी-नोंदणीकृत संशोधन गुंतवणूक सल्लागार राइट रिसर्चच्या सह-संस्थापक सोनम श्रीवास्तव यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये पी-नोट्सद्वारे गुंतवणूक कमी होऊ शकते. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय बाजारातून माघार घेतल्याने त्यात घट होण्याची अपेक्षा आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या आकडेवारीनुसार, पी-नोट्सच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूक ऑगस्ट अखेरीस 84,810 कोटी रुपये होती. यात इक्विटी, डेट आणि हायब्रिड सिक्युरिटीजचा समावेश आहे. जुलैअखेर हा आकडा 75,725 कोटी रुपये होता.
दरम्यान, ऑगस्टमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 51,200 कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली. हा आकडा गेल्या 20 महिन्यांतील सर्वाधिक होता. त्याचवेळी, सप्टेंबरमध्ये आतापर्यंत एकूण 6,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एफपीआय चलनात प्रचंड चढउतार दिसून आले आहेत.