धोकादायक ट्रॉली हटविण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर रोडवर लावण्यात आलेली ट्रक्टर ट्रॉली अपघाताला निमंत्रण ठरत आहे. रस्त्यावरच माती व वाळूने भरलेली ट्रॉली लावण्यात आल्याने रात्रीच्यावेळी निदर्शनास न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कंत्राटदाराने सदर ट्रॉली हलवावी, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.
स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने माती व वाळू भरलेली ट्रक्टरची ट्रॉली मागील दोन दिवसांपासून खानापूर रोडवरील स्टेट बँकेसमोर लावण्यात आली आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. ट्रक्टरला कोठेही रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्यावेळी वाहन ट्रॉलीजवळ आल्यानंतरच त्याची माहिती होत आहे. त्यामुळे धोकादायक स्थितीत असलेली ही ट्रॉली हलविण्याची मागणी होत आहे.
आधीच काँग्रेसरोडवरील अनेक पथदीप बंद आहेत. त्यातच बसव जयंती, शिवजयंती व रमजानमुळे रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. बुधवारी बँका सुरू झाल्यामुळे ये-जा करणाऱया ग्राहकांनाही या ट्रॉलीचा त्रास झाला. त्यामुळे सदर ट्रॉली संबंधित कंत्राटदाराने बाजूला करणे आवश्यक आहे.