प्रतिनिधी/वाळपई
सत्तरी तालुक्मयाच्या सुर्ला या ग्रामीण भागात कदंब महामंडळाची बस अनियमित बनल्यामुळे शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. यामुळे ही कदंब बस नियमित करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी व विद्यार्थ्यांनी केली आहे.
सुर्ला-सत्तरी भागातील विद्यार्थी शाळेसाठी केरी व अन्य ठिकाणी जात असतात. यामुळे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कदंब प्रवासी बस गावातून निघत असते. या बससमधून मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी वर्ग व सरकारी नोकर प्रवास करतात. मात्र गेल्या काही दिवसापासून सदर बस अनियमित बनलेली आहे. यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत आहेत.
पालकानी दिलेल्या माहितीनुसार कदंब बस अनियमित असल्यामुळे विद्यार्थ्यांना गोवा-बेळगाव नाक्मयावर बसेससाठी थांबावे लागते. त्यांना शाळेला जाण्यासाठी उशीर होतो. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र या तक्रारीची दखल आजपर्यंत घेण्यात आलेली नाही. स्थानिक आमदार डॉ. देवीया राणे यांच्यापर्यंत तक्रारी केल्या आहेत. त्यांनी कदंब महामंडळाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून बस नियमित करण्याचा आदेश दिला होता. मात्र त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.
दरम्यान गावामध्ये नियमितपणे प्रवासी बस येणे अत्यंत गरजेचे आहे. कदंब महामंडळाची बस अनियमित झाल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर गावातील नागरिकांची अडचण निर्माण झालेली आहे, असे स्थानिक पंच सदस्य सोनिया गांवकर यांनी सांगितले.