ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काबुलमधील फिदाईनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तालिबान आणि अल कायद्यापेक्षा धर्मांध मानल्या जाणाऱ्या इस्लामिक स्टेट खोरासनने (ISIS-K) घेतली आहे. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून, भारतावर ISIS-K चा धोका वाढला आहे. ही संघटना दक्षिण आशिया आणि नंतर भारतात घुसखोरी करू शकते, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
तरुणांना त्यांच्या संघटनेशी जोडणे आणि नंतर दहशतवादी हल्ले करणे हा या संघटनेचा हेतू आहे. त्यामुळे भारतात घुसून ही संघटना जिहादी मानसिकता तयार करु शकते, असे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. जर या गटाने षडयंत्र रचले तर भारतातील काही कट्टरपंथी किंवा दहशतवादी संघटना पुन्हा डोके वर काढू शकतात. हे दहशतवादी संघटन देशातील तरुणांना त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती आहे.