लोणावळा : दलित मतांवर राजकारण करणं सोपं आहे पण निवडून येणं अवघड असल्याने यापुढील काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्ष बांधणी करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी लोणावळय़ात पत्रकार परिषदेत सांगितले.
आठवले म्हणाले, देशभरात शाखा असणारा आरपीआय पक्ष आहे. महाराष्ट्रात पक्षाला मान्यता मिळावी याकरिता किमान 12 ते 13 आमदार व दोन खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग व न्यायलायात आम्ही 13 प्रकारच्या चिन्हांची मागणी केली आहे. त्यापैकी एक कायमस्वरूपी चिन्ह पक्षाला मिळावे, याकरिता आमचा प्रयत्न सुरु आहे. केवळ दलित मतांवर निवडून येणं अवघड आहे. त्यामुळे आम्ही मराठा व सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्ष बांधणी करणार आहे. याकरिता पक्षांचे निरिक्षक नेमण्यात येणार असून 25 लोकांची वर्किंग कमिटी देखील बनविण्यात येणार आहे.
अधिक वाचा; Pune : चुहा गँग टोळीप्रमुखासह साथीदारांवर ‘मोक्का’
दरम्यान, 21 तारखेला रिपाईच्या ऑल इंडिया नॅशनल कमिटीची दिल्ली येथे बैठक आहे, त्यामध्ये विविध मुद्दयांवर चर्चा होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.