खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे प्रतिपादन : कणकुंबी येथे जलधारा कार्यक्रमाचे उद्घाटन
बातमीदार /खानापूर
भाजपा व काँग्रेस केवळ जातीचे राजकारण करत आहेत. त्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केले आहे, याची जाणीव राज्यातील सर्व जनतेला झाली आहे. आता जनतेला निधर्मी जनता दलाशिवाय पर्याय नाही. सर्व लोक निजद पक्षासोबत येणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्हय़ातून निजद पक्षाचे 12 आमदार निवडून आल्यास राज्यात पुन्हा निजदचे सरकार येईल. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन निजद नेते व खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी केले. निजदच्यावतीने आयोजित केलेल्या जलधारा कार्यक्रमाचे उद्घाटन कणकुंबी येथील मलप्रभा उगमस्थानी शनिवारी झाले.
यावेळी निजद राज्य कोअर कमिटीचे सदस्य व मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान, निजदचे नेते शंकर माडलगी, नागराज हुबळ्ळी, बाळू बापशेट, लायकअल्ली बिचून्नावर, इरय्या हिरेमठ, मेघा कुंदरगी, आलिम नाईक, रेवणसिद्धय्या हिरेमठ, एम. ए. इनामदार आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह जिल्हय़ातील निजदचे अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मलप्रभा नदी खानापूर तालुक्मयातून वाहते. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर खानापूर तालुक्मयातील जनतेचा प्रामुख्याने हक्क आहे. यासाठी नदीचे पाणी खानापूर तालुक्मयातील जनतेला प्राधान्याने देण्यात यावे, असा प्रस्ताव यावेळी निजद नेते व मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान यांनी मांडला.