अध्याय पंचविसावा
अध्यायाची सुरवात करताना नाथमहाराज म्हणतात, आपण सर्व भगवंताच्या विभूती आहोत आणि भगवंतातच सर्व लोक सामावलेले आहेत, हेच उपनिषदाचे तात्पर्य आहे. थोडक्मयात सर्व लोक म्हणजेच भगवंत असल्याने संपूर्ण अभेदभाव स्पष्ट जाणवतो. ह्याच अभेदभावाने परब्रह्म हे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्यामध्ये निरंतर परिपूर्णच असते हे भगवंतानी सांख्यशास्त्र सांगण्याच्या निमित्ताने सांगितले. हे सांख्यमत ऐकून उद्धव आपल्याच मनाशी विचार करू लागला की, अहंभाव हाच संसाराला वाढवितो, तर तोच मुळी सोडून द्यावा पण अहंकार चित्ताला असा काही जडलेला आहे की, सोडायला गेलो तर मुळीच सुटत नाही. भगवंतानी कितीही वेळा अहंकार किंवा मी पणा सोडण्याचे महत्त्व समजावून सांगितले आहे परंतु माझ्या सामर्थ्याने मी तो सोडू शकत नाही. बरे, श्रीकृष्णाला तरी आता किती वेळा विचारावे? काय करावे काहीच कळत नाही. मती अगदीच कुंठीत झाली आहे. भक्ताच्या मनातलं खडा न खडा जाणणाऱया भगवंताना उद्धवाला पडलेली चिंता लगेच कळून आली. भगवंत आपल्या भक्तांचे अत्यंत कनवाळू असल्यामुळे अहंता नाहीशी करण्याची युक्ती ते उद्धवाला आपणहूनच सांगू लागले. बरोबरच आहे भगवंत आणि भक्त याचं नातं आई मुलासारखंच समजलं जातं, मुलाने आईला न सांगताच मुलाला भूक लागलीये हे आई ओळखते आणि ती त्याला स्तनपान देऊ लागते. नव्हे नव्हे, मुलाबद्दल वाटणाऱया अंतःकरणातील कळवळय़ानेच आपण होऊन धावत जाऊन ती त्याला पाजू लागते. इथं तर भक्तवत्सल श्रीकृष्णाच्या अंतःकरणांत उद्धवाविषयीचा कळवळा त्याहूनही कितीतरी अधिक आहे. मुलाला स्वतःची चिंता नसते, पण आईच त्याचे हित करावयास प्रवृत्त होते. त्याप्रमाणे उद्धवाचा हेतु पूर्ण करण्यासाठी भगवंत पुढे आले. उद्धवासारख्या भक्तात जे काही न्यून असेल, ते ते परिपूर्ण करावयाला ते तयारच असतात. त्यांच्या या ब्रीदाला जागून, ते या अध्यायामध्ये सत्व, रज आणि तम या त्रिगुणांवर जय कसा मिळवावा ते सांगतील आणि ते त्रिगुणांच्याही पलीकडे कसे आहेत हे सांगून त्यांचा निर्गुणपणाही दाखवून देतील. सांख्यशास्त्राप्रमाणे प्रकृतीपुरुषांचा विचार कितीही बुद्धिपूर्वक केला, तरी जोपर्यंत गुणांवर पूर्णपणे जय मिळत नाही, तोपर्यंत सुखदुःख व अहंभाव हा वाढणारच. प्राणीदेह हा तिन्ही गुणांपासून झाला आहे. म्हणून देहाच्या मदतीने त्रिगुणावर विजय मिळवणं शक्मय नाही कारण, आपल्याच पायावर कोण कुऱहाड मारून घेईल. ज्याप्रमाणे कुऱहाडीचा दांडा वृक्षांच्या जातीतच जन्मास येतो पण तो कुऱहाडीला मिळून तिच्याकडून साऱया वृक्षांचे छेदन करवितो. त्याप्रमाणे विवेकाला सत्त्वगुण मिळाला म्हणजे तो तिन्ही गुणांचा समूळ उच्छेद करून टाकतो. विवेक म्हणजे चांगलं काय, वाईट काय हे कळण्याची व त्यानुसार वागण्याची बुद्धी. त्याप्रमाणे वागत गेल्यास मूळचे निर्गुणत्व आपोआप प्रगट होते. तिन्ही गुण हेच मुळी मिथ्या आहेत त्यामुळे त्यांचा नाश होणे निश्चित आहे आणि निर्गुणत्व हेच काय ते नित्य व सत्य आहे. या अर्थाचे निरूपण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत. भगवंत उद्धवाला म्हणाले, हे पुरुषश्रे÷, कोणत्या गुणामुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो, ते मी तुला सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण एकमेकात न मिसळता भिन्न भिन्न असतात. पुरुषापाशी जो भिन्न भिन्न एकेक गुण असतो, त्या प्रत्येकापासून कोणकोणते चिन्ह दृष्टीस पडते ते ऐक. हे माझे भाषण निःसंदेह, सावधान व निर्विकल्प मन करून जो ऐकेल तो स्वतःच परिपूर्ण पुरुषोत्तम होईल. उद्धव हा भक्तीभावार्थानं अत्यंत श्रे÷, प्रभूंच्या वचनावर विश्वास ठेवण्याबद्दल तर अत्यंत अग्रगण्य, म्हणून श्रीकृष्ण आपल्या मुखाने उद्धवाला ‘हे पुरुषश्रे÷ा!’ असे म्हणून हाक मारू लागला. या जगामध्ये अनेक योनी आहेत. त्यात मनुष्यपणा हा अत्यंत उत्तम होय व त्यातही शुद्ध, अव्यंग, संपूर्ण अवयवांनी युक्त आणि कोणत्याही प्रकारे उणीव नाही असा देह असावा. अशाही सर्व देहांमध्ये पुरुषदेहाचेच श्रे÷त्व आहे. त्यातही विचारशील, वेदशास्त्रं जाणणारा व मुमुक्षु, म्हणजे आपल्या वागणुकीमुळे जे जे पाप पुण्य जमा होईल ते आपल्याला भोगावे लागेल याची जाणीव असलेला पुरुष त्रिगुणातून मुक्त होण्यास योग्य ठरतो.
क्रमशः