शहर परिसरात संततधार, अनेक घरांत पाणी शिरल्याने तारांबळ
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे. सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाने पुन्हा बळ्ळारी नाला, मार्कंडेय नदी परिसरातील शिवाराला पूर आला आहे. चौथ्यांदा यावषी पूर आल्याने शेतकऱयांना मात्र या पावसाचा फटका बसला आहे. या पावसाने स्मार्टसिटींच्या कामांचा दर्जा बेळगावकरांसमोर उघडा पडला आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी झालेल्या दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. दिवसरात्र पाऊस पडत असल्यामुळे शिवारे तुडुंब भरली आहेत. पुन्हा नाले तसेच विहिरी देखील तुडुंब भरल्या असून या पावसाने लावणी केलेले भात देखील पाण्याखाली गेले आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या दिवसापासून पावसाला सुरूवात झाली आहे. सलग पाऊस पडत असल्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे.
या पावसामुळे शहरातील भाजी विपेते, फेरीवाले तसेच इतर बैठे व्यापाऱयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दिवसरात्र पाऊस पडत असल्यामुळे सखल भागामध्ये सर्वत्र पाणी साचून आहे. आनंदनगर, केशवनगर, गांधीनगर, अन्नपुर्णेश्वरीनगर या परिसरात अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरत आहे. येळ्ळूरच्या रस्त्यावर देखील पाणी साचून आहे. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
घराची कोसळली भिंत
शहापूर, भारतनगर येथील एका घराची भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी घडली नाही. याचबरोबर भाग्यनगर येथेही एक झाड कोसळले आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे. घरावरच हे झाड कोसळल्याने घराचे देखील नुकसान झाले आहे.
जिह्यातही काही गावांमध्ये घरांची पडझड
परतीचा पाऊस हा संपूर्ण जिह्यामध्येच कोसळत आहे. सौंदत्ती तालुक्मयामध्ये काही घरांची पडझड झाली आहे तर बेळगाव, बैलहोंगल, कित्तूर तालुक्मयांमध्येही घरांची पडझड झाली आहे. या पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजविला असून पाऊस कधी जाणार याकडेच आता साऱयांचे लक्ष लागले आहे.
कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा धोकापातळीकडे
निपाणी : पावसाने निपाणी, चिकोडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोर धरला आहे. परिसराबरोबरच धरण क्षेत्रातही जोरदार पावसामुळे निपाणी तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चिकोडी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. निपाणीतील 6, चिकोडी तालुक्यातील 4 पैकी 2 असे 8 पूल, बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा, वेदगंगा दूधगंगा धोकापातळीकडे गेली आहे. नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाल्याने पुन्हा एकदा नागरिक स्थलांतराच्या तयारीत आहेत. 123 टीएमसी क्षमता असलेले आलमट्टी धरण सोमवारी पूर्ण क्षमतेने भरले आहे.