कोल्हापूर : शिस्तभंगाची कारवाई कोणावर कधी होणार? हे लवकरच कळेल होईल. ते गुपितच ठेवलेलं बरं. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उदय सामंत (Uday Samant) यांनी सूचक उत्तर दिलं.
सामंत आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो शिवसेनेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला बंधनकारक असेल. महाविकास आघाडी मधील शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये निवडणूक आयोगानेच बदल केले आहेत. शिवसेना म्हणजे आता एकच शिवसेना आहे. आमची युती भाजपसोबत असेल. संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होणार नाही, असं त्यांना आश्वासन दिले असल्याचे सामंत यांनी सांगितले.
अधिक वाचा : आयोगाचा निर्णय दबावापोटी; माजी मंत्री सुनील केदार यांची टीका