ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांनी बुधवारी अतिक्रमणविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून दिल्ली (delhi) आणि मध्य प्रदेशातील (madhya pradesh) हिंसाचारग्रस्त भागात बुलडोझरचा वापर केल्याबद्दल सरकारला फटकारत देशाची घटनात्मक मूल्ये नष्ट केल्याचा आरोप केला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने मनातील द्वेष संपवावा, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दिल्लीच्या दंगलग्रस्त जहांगीरपुरीतल्या (jahangirpuri violence) अनधिकृत बांधकामांवरती आजपासून पोलिसांच्या मदतीने पालिकेने कठोर करवाईला सुरूवात केली आहे. येथील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला. पण न्यायालयाच्या आदेशांनंतर ही कारवाई थांबली. पण दिल्लीतील आजच्या कारवाईवर राहुल गांधींनी जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी संविधानाची प्रस्तावना असलेले पेज ट्विट करत बुलडोझरचा फोटो शेअर केला आहे.यावेळी त्यांनी सरकारने गरीब आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आहे. या सगळ्यांपेक्षा भाजपने मनातील द्वेष नष्ट करायला हवा, असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.
राहुल गांधी म्हणाले, “मोदीजी, देशात मोठ्या प्रमाणात मंदी आहे. वीज खंडित झाल्यामुळे लघु उद्योगबंद पडतील, त्याऐवजी अधिक रोजगार कसे निर्माण होतील याकडे लक्ष द्या. द्वेषाचे बुलडोझर थांबवा, वीज प्रकल्प सुरू करा.असे म्हणते आहे.