मायणी / वार्ताहर :
मायणी ता.खटाव येथील मयत शेतकऱ्याचे बोगस आधारकार्ड बनवून दहिवडी उपनिबंधक कार्यालयात खोटा दस्तावेज तयार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रोसिटीसह १६ विविध कलमान्वये दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आपल्या खटाव माण मतदारसंघातील वाळू तस्करीचा बाँब टाकणारे जयकुमार गोरे यांनीच मायणी येथील मयत शेतकऱ्याच्या जागी बोगस व्यक्तीस उभा करीत मयत शेतकऱ्याच्या नावे बोगस आधारकार्ड बनवून बोगस दस्तावेज शासकीय कार्यालयात नोंदवल्याने सर्वत्र खळबळ झाली आहे.