सातारा/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील २ शिवसैनिक मातोश्री च्या दिशेने भर पावसात पायी चालत निघाले आहेत. ७ ऑगस्ट रोजी पायी चालत निघालेले शिवसैनिक आज साताऱ्यात पोहचले आहेत. साताऱ्यात पोहचल्यानंतर साताऱ्यातील शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केलं.
सांगलीहून मातोश्रीकडे पायी चालत दोन शिवसैनिक निघाले आहेत. आज हे दोन शिवसैनिक साताऱ्यात पोहोचले. यावेळी येथील शिवसैनिकांनी त्यांची स्वागत केले. या २ शिवसैनिकांनी हातात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर घेऊन पायी चालत निष्ठा यात्रा काढली आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निष्ठा,प्रेम आणि मदतीचा हात देण्यासाठी अजय पाटील आणि अक्षय बुरुड हे शिवसैनिक चालत निघाले आहेत.
रोज ४० किलोमीटर चा प्रवास करून ते मुंबईत १८ तारखेपर्यंत पोहचणार आहेत. मातोश्रीवर पोहचल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपला पाठिंबा आणि निष्ठा व्यक्त करणार आहेत.