कागल: प्रतिनिधी
किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या 2 मुलांचीही हत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. तिहेरी हत्याकांडानंतर आरोपी प्रकाश माळीने कागल पोलिसांसमोर आत्ममर्पण केलं. पत्नी गायत्री माळी,मुलगी अदिती माळी आणि मुलगा कृष्णा माळी अशी मृतांची नावं आहेत.. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे..चारित्र्याच्या संशयावरून माळी यान टोकाचं पाऊल उचलल आणि पत्नीसह दोन मुलांची केली हत्या केली आहे.