सीमा तपासणी नाक्यावर कोटय़ावधीचा खर्च
तीन वर्षे सुरु होण्याची प्रतिक्षाच
कागल / प्रतिनिधी
पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथे प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून अद्ययावत सीमा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. हा नाका परिवहन विभागाच्या मुंबईतील कार्यालयाशी इंटरनेटच्या सहाय्याने जोडण्यात आला आहे. गेली तीन वर्षे हा नाका सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान कोविड काळजी केंद्रासाठी हा नाका महासूल विभागान ताब्यात घेतला होता. आता कोरोना महामारी कमी झाली आहे . त्यामुळे आतातरी हा नाका सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे .
कागल शहराच्या दक्षिणेला राष्ट्रीय महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाचा सीमा तपासणी नाका आहे. या नाक्याशेजारीच सुमारे 52 एकर जमिन संपादीत करून नवीन अद्ययावत तपासणी नाका उभारण्यात आला आहे . याठिकाणी प्रदेशिक परिवहन विभागासह उत्पादन शुल्क विभागाचा सीमा तपासणी नाका सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने भूसंपादनाकरिता लाखो तर नाका उभारणीसाठी कोटय़ावधी रूपये खर्च केले. सन 2013 साली नाक्यासाठी जमिन संपादनाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर नाक्याच्या उभारणीच काम पाच वर्ष चालले होते. सन 2018 मध्ये नाक्याच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले . महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रत्येकी दहामार्गिका तयार करण्यात आल्या आहेत . पहिल्या तीन मार्गीका दुचाकी, रिक्षा आणि कारसाठी ठेवण्यात आल्या आहेत . तर उर्वरीत 60,100 आणि 150 मेट्रीक टन मालाची वाहतूक करणाया वाहनासाठी आहेत. नाक्यात मालवाहतूक वाहने आल्यानंतरत्यांची वजन करण्यासाठी अद्ययावत वजनकाटे बसविण्यात आले आहेत . ही संपूर्ण यंत्रणा संगणकाला जोडण्यात आली असून ती स्वयंचलित आहे. तसेच येथील कामकाजवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत . ही संपूर्ण यंत्रणा प्रादेशिक परिवहन विभागाच्या मुंबईतील कार्यालयाशी इंटरनेटच्या सहाय्याने जोडण्यात आली आहे . तसेच येथे कार्यालयासाठी अद्ययावत प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. ज्यादा वाहतूक करणाया वाहनातील माल ठेवण्यासाठी दोन गोदामेही बांधली आहेत.
प्रशस्त वाहनतळागृह चालकासाठी इतर सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत . अधिकारी आणि कर्मचायांच्या करिता निवासस्थानी बांधली आहेत. कोरोना महामारीत काविड़ काळजी केंद्रासाठी या इमारतीसह गोठामे जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांनी महसूल विभागाच्या ताब्यात घेतली होती. कोरोना संसर्ग कमी झाल्याने गेल्या वर्षभरापासून येथील कोटिड सेंटरही बंद करण्यात आली आहेत . शासनान कोठय़ावधी रूपये खर्च करून उभारलेला हा सीमा तपासणी नाका आतातरी गुरु व्हावा अशी अपेक्षा वाहनचालकासह शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे.