आणखी 25 ते 35 वर्षांनंतर पृथ्वीवर सर्वात मोठी टंचाई जर कोणत्या वस्तूची निर्माण होणार असेल तर ती पिण्याच्या स्वच्छ पाण्याची असेल. कदाचित पिण्याच्या पाण्यासाठी युद्धे किंवा महायुद्धही होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. वास्तविक पृथ्वीवर पिण्याच्या गोडय़ा पाण्याचा साठा कित्येक अब्ज वर्षे आहे तेवढाच आहे. तथापि, मानवाच्या अमर्याद लालसेपोटी निसर्गाची झपाटय़ाने हानी होत असून त्याचा समतोल बिघडल्याने पिण्याचे पाणी उपलब्ध असूनही माणसापर्यंत पोहोचणे अशक्मयप्राय होणार आहे. औद्योगिक क्रांतीच्या अतिरेकामुळे वायुमंडलात उष्णता धरून ठेवणाऱया अशुद्ध वायुंचे प्रमाण नको इतके वाढले आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ अनुमानापेक्षा अधिक वेगाने होत आहे. परिणामी हिमनद्या झपाटय़ाने वितळत असून काही दशकांनंतर त्या कोरडय़ा पडतील आणि पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण होईल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
या परिस्थितीतून मानव जातीला वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न काही मानव समूह करीत आहेत. यातच उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे ‘कल के लिए जल’ (उद्यासाठी पाणी) या नावाने एक अभियान काही निसर्गप्रेमींनी हाती घेतले आहे. प्राकृतिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचे महत्त्वाचे कार्य करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये कोरडय़ा पडलेल्या 3 हजार 500 जलकुंडांना जीवनदान देण्यात आले आहे. आता हे जलकुंड स्वच्छ पिण्याच्या पाण्याने भरलेले दिसून येतात आणि आसपासच्या रहिवाशांना शक्मय तेवढे पाणी पुरवितात. भारतात इतिहासकाळी 7 लाख तळी आणि जलस्रोत होते, असा उल्लेख पुरातन साहित्यात आढळतो. मात्र, यापैकी बहुतेक जलस्रोत आता उपयोगात नसल्याने वाळून गेले आहेत किंवा अस्वच्छ झालेले आहेत. त्यांचा जीर्णोद्धार केल्यास किमान 30 कोटी जनतेला विनासायास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, असे तज्ञांचे अनुमान आहे. या अभियानाचा विस्तार होणे आवश्यक असून प्रत्येक जिल्हय़ात ते हाती घेतल्यास पिण्याच्या पाण्याची भविष्यकालीन टंचाई निदान 25 ते 30 टक्के तरी कमी होऊ शकेल, असे अनुमान आहे. सरकारनेही ‘कल के लिए जल’ या अभियानाला साहाय्यता देण्यासाठी विशेष निधीची तरतूद केली असून येत्या दहा वर्षात किमान 50 हजार जलस्रोत पुनरुज्जीवित केले जातील, अशी शक्मयता आहे.