18 गाळेधारकांनीही घेतली न्यायालयात धाव : सुनावणीकडे गाळेधारकांचे लक्ष : महापालिकेच्या आडमुठय़ा धोरणामुळे पुनर्वसन कामात अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
कलामंदिरच्या जागेत व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, या ठिकाणी असलेले 18 गाळे हटविण्यात आले होते. काही गाळे हटविण्यास न्यायालयाची स्थगिती आहे. पण आता 18 गाळेधारकांनीही न्यायालयात धाव घेतली असून दि. 19 रोजी सुनावणी आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीकडे गाळेधारकांचे लक्ष लागले आहे.
टिळकवाडी काँग्रेस रोडचे रुंदीकरण करताना शेकडो व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली. काही मालमत्ताधारकांना रुंदीकरणाचा फटका बसला होता. यामुळे नुकसानग्रस्तांना कलामंदिर शेजारील खुली जागा लीजवर देण्यात आली होती. या ठिकाणी व्यावसायिकांनी स्वखर्चाने गाळे बांधून व्यवसाय सुरू केला आहे. व्यावसायिकांनी 2010 पर्यंत जागेचे भाडे मनपाला दिले आहे. मात्र, त्यानंतर गाळेधारकांकडून भाडे घेण्यास महापालिका प्रशासनाने टाळाटाळ चालविली होती. येथील व्यावसायिकांना व्यवसाय परवानाही दिला नाही. नुकसानग्रस्तांमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आहेत. काही भाजी विपेत्यांचादेखील यामध्ये समावेश आहे.
सर्व व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पण व्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी दुकाने पाडण्यात आल्याने हे व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. कलामंदिर परिसरात उभारलेल्या संकुलात व्यवसाय सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल, असे मनपावतीने सांगण्यात आले होते. पण तीन वर्षांनंतरही 18 गाळेधारकांना गाळे देण्यात आले नाहीत. साई मंदिर रोडवरील गाळे रिकामी पडले आहेत. सदर गाळे व्यावसायिकांना देण्यात आले नाहीत. त्यामुळे सदर गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली असून दि. 19 रोजी सुनावणी आहे.
मनपा प्रशासन उदासीन
भट यांनी न्यायालयात धाव घेऊन गाळे हटविण्यास स्थगिती घेतली आहे. यामुळे गाळे हटविले नाहीत. नुकसानभरपाई देण्यास गाळे व खुली जागा नसल्याचे प्रतिज्ञापत्र मनपाने न्यायालयात दिले आहे. त्यामुळे दि. 19 रोजी सुनावणी होणार आहे. वास्तविक पाहता साई मंदिर परिसरातील गाळे धूळ खात पडले असून या ठिकाणी नुकसानग्रस्त गाळेधारकांचे पुनर्वसन करणे शक्मय आहे. पण याबाबत मनपा प्रशासन उदासीन आहे. त्यामुळेच कलामंदिरच्या उभारणीत अडथळे निर्माण झाले आहेत. जर व्यवसायिकांना गाळे किंवा खुल्या जागेत पुनर्वसन केल्यास अर्धवट स्थितीत असलेले व्यापारी संकुलाचे काम मार्गी लागण्याची शक्मयता आहे. पण महापालिकेच्या आडमुठय़ा धोरणामुळे कामात अडचण निर्माण झाली आहे.