महाप्रसादने सोहळ्याची सांगता
प्रतिनिधी/कळंबा
येथील (ता करवीर ) कळंबे तर्फ ठाणे गावचे श्रद्धास्थान श्री महालक्ष्मी अंबाबाई यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमावेळी दैनिक तरुण भारत विशेष अंकांचे प्रकाशन पालकमंत्री सतेज डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्तीत गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले करवीर पंचायत समिती सदस्या मीनाक्षी पाटील सरपंच सागर भोगम उपसरपंच राजेंद्र गुरव आदी मान्यवरांच्या उपस्तीत होते.सकाळी मंदिराच्या पुजाऱ्यानी दुग्धअभिषेक करून देवीची पारंपरिक अन्नपूर्णाच्या स्वरूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली.
ही पूजा या अन्नपूर्णाच्या स्वरूपात बांधण्यात आली ही श्रीपूजक पूजा तानाजी गुरव, प्रथमेश गुरव, यांनी बांधली होती.
ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची आठ दिवस चाललेली यात्रेची शनिवारी महाप्रसादाने सांगता झाली . गेल्या आठ दिवसात यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात्राकाळात कात्यायनी भेटीचा पालखी सोहळा, हनुमान भेटीचा पालखी सोहळा, होम हवन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर गावातील अनेक तरुण मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात्राकाळात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी अंबाबाई भक्तगण मंडळाबरोबरच कळंबा ग्रामपंचायत प्रशासन व महालक्ष्मी भक्तमंडळ व यात्रा कमिटीने विशेष परिश्रम घेतले.